शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:02 IST

ऑनलाईन लोकमत आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आले. या चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच एकच खळबळ ...

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत होती महिला

ऑनलाईन लोकमत आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आले. या चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.उषा नरेंद्र कोसुळकार (३१) रा. कामठी ही महिला दुपारच्या सुमारास कामठी शिवारातील स्वत:च्या शेतात कापूस वेचत होती. ती आपल्या कामात गुंग असताना तिच्यासमोर अचानक साडी घातलेला, डोक्यावर पदर व तोंडाला स्कार्फ बांधलेला पुरुष पाठीमागून आला व चुपचाप तुझ्याजवळ जे असेल ते दे. आरडा-ओरड करू नको, अशी दमदाटी केली. यामुळे महिलेने गळ्यातील दीड ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, एक ग्रॅम सोन्याचे मनी व साडेतीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप, असा एकूण ३ हजार ५०० रुपयाचा ऐवज काढून दिला. हा ऐवज घेवून स्त्री वेशातील चोरटा पसार झाला. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात जमादार ओमप्रकाश इंगोले, जमादार दिनेश गायकवाड या संशयीत चोरट्याचा शोध घेत आहेत. सदर घटनेने कापूस वेचणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गत वर्षी याच हंगामात महिला कामाला गेल्या असताना घरातून ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा चोरट्यांनी नवी पद्धत अंमलात आणल्याने शेतमजूर महिला दहशतीत आल्याचे दिसत असून पोलिसांनी चोरटे पकडणे गरजेचे झाले आहे.महिलांमध्ये भीतीचे वातावरणसध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील महिला त्यांच्या शेतात तर काही महिला दुसºया शेतकऱ्यांच्या शेतात कामाकरिता जात आहेत. शेतात कापूस वेचताना महिलांची संख्या कमी असल्याने त्या दूर-दूर असतात. यात चोरीचा हा प्रकार घडल्याने महिलांत भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी या चोरट्याला पकडून महिलांच्या मनात असलेली भीती कमी करावी, अशी मागणी होत आहे.