शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर उद्ध्वस्त

By admin | Updated: March 13, 2015 02:07 IST

जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे.

वर्धा : जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे. या पावसासोबत वारा व गारपीट होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वर्धा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. पावसासोबत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अख्खे ममदापूर गावच उद्ध्वस्त झाल्यागत परिस्थिती आहे. या गावातील ७० टक्के घरांवरील छत या वाऱ्यामुळे उडून गेले. यामुळे नागरिक उघड्यावर आले आहेत. सोमवारी रात्री देवळी व कारंजा (घाडगे) या तालुक्यात पावसाने कहर माजविला. बुधवारी रात्री आलेल्या वादळी पावसाचा फटका वायगाव (नि.), कानगाव, गिरोली, पाथरी, टाकळी (चना), ममदापूर, सरूळ, भिवापूर, सेलू (काटे), कुरझडी, आजगाव, वडद, नेरी या गावांना बसला. देवांगण येथील खान यांच्या शेतातील संत्रा पुर्णत: उद्ध्वस्त झाला. ममदापूर येथे वारा आला की चक्रीवादळ हेच कळायला मार्ग नाही. येथे बऱ्याच घरांवरीरल छत उडाले. शासनाने पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कारंजा (घाडगे) येथील मधुकर बाजारे यांच्या घरावर वीज कोसळली. याम कुठलीही प्राणहानी झाली नाही. (प्रतिनिधी) सेवाग्राम रेल्वे स्थानकावर वीज कोसळलीया वादळी पावसासह विजांचा गडगडात सुरूच होता. यात रात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका झाडावर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळली. ही वीज एका झाडावर कोसळली. यात उभे झाड खालपासून वरपर्यंत अक्षरश: सोलल्या गेले. संत्रा बाग उद्ध्वस्तवायगाव (निपाणी) परिसरात असलेल्या देवांगण शिवारात असलेल्या संत्र्याच्या बगिच्याला या वादळाचा चांगलाच फटका बसला. यात बागेतील संत्रा जमिनीवर पडलाच तर उभी झाडेही वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळली. पोल्ट्री फार्मचे नुकसानवायगाव येथील प्रफुल्ल मोते यांच्या पोल्ट्री फार्मचेही यात नुकसान झाले. या वादळात त्यांच्या ५५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. घरांवरील टिनपत्रे उडाल्याने संसार उघड्यावर ममदापूर गावाला बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. आलेल्या वादळात पाऊस व गारपीट झाल्याने त्याचा फटका शेतांना बसला. आलेला वारा होता की चक्रीवादळ हे समजण्यापूर्वीच गावातील ललीता केराम, कवडू गिरडे, बबन सयाम, पुरुषोत्तम दुधकोर, संजय धुर्वे, नितिन कोरेकर, विठ्ठल पुसदकर, भाऊराव केराम, मनोहर नेजेकर, सुरेश इखार, जयवंता पेंदाम, सुधाकर मरस्कोल्हे, शंकर नेहारे, नानाजी केराम, प्रभाकर देशमुख यांच्या घरावरील छत उडून गेले. गारपीटीमुळे गहू, चना, पालेभाज्या आदी पिकांचे नुकसान झाले. यात गावातील उमेश ठाकूर, प्रविण काटोले, माणिक लांबट, साहेबराव चावरे, गंगाधर घोडखांदे, प्रशांत निवल, मंगेश चौधरी, रंगरावर तळवेकर, सुभाष तळवेकर यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या या भागाची पाहणी करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.