शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

ममदापूर उद्ध्वस्त

By admin | Updated: March 13, 2015 02:07 IST

जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे.

वर्धा : जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच आहे. दिवसभर उन्ह तापून सायंकाळी अचानक आभाळ दाटून पाऊस येत आहे. या पावसासोबत वारा व गारपीट होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वर्धा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. पावसासोबत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अख्खे ममदापूर गावच उद्ध्वस्त झाल्यागत परिस्थिती आहे. या गावातील ७० टक्के घरांवरील छत या वाऱ्यामुळे उडून गेले. यामुळे नागरिक उघड्यावर आले आहेत. सोमवारी रात्री देवळी व कारंजा (घाडगे) या तालुक्यात पावसाने कहर माजविला. बुधवारी रात्री आलेल्या वादळी पावसाचा फटका वायगाव (नि.), कानगाव, गिरोली, पाथरी, टाकळी (चना), ममदापूर, सरूळ, भिवापूर, सेलू (काटे), कुरझडी, आजगाव, वडद, नेरी या गावांना बसला. देवांगण येथील खान यांच्या शेतातील संत्रा पुर्णत: उद्ध्वस्त झाला. ममदापूर येथे वारा आला की चक्रीवादळ हेच कळायला मार्ग नाही. येथे बऱ्याच घरांवरीरल छत उडाले. शासनाने पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कारंजा (घाडगे) येथील मधुकर बाजारे यांच्या घरावर वीज कोसळली. याम कुठलीही प्राणहानी झाली नाही. (प्रतिनिधी) सेवाग्राम रेल्वे स्थानकावर वीज कोसळलीया वादळी पावसासह विजांचा गडगडात सुरूच होता. यात रात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका झाडावर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळली. ही वीज एका झाडावर कोसळली. यात उभे झाड खालपासून वरपर्यंत अक्षरश: सोलल्या गेले. संत्रा बाग उद्ध्वस्तवायगाव (निपाणी) परिसरात असलेल्या देवांगण शिवारात असलेल्या संत्र्याच्या बगिच्याला या वादळाचा चांगलाच फटका बसला. यात बागेतील संत्रा जमिनीवर पडलाच तर उभी झाडेही वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळली. पोल्ट्री फार्मचे नुकसानवायगाव येथील प्रफुल्ल मोते यांच्या पोल्ट्री फार्मचेही यात नुकसान झाले. या वादळात त्यांच्या ५५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. घरांवरील टिनपत्रे उडाल्याने संसार उघड्यावर ममदापूर गावाला बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. आलेल्या वादळात पाऊस व गारपीट झाल्याने त्याचा फटका शेतांना बसला. आलेला वारा होता की चक्रीवादळ हे समजण्यापूर्वीच गावातील ललीता केराम, कवडू गिरडे, बबन सयाम, पुरुषोत्तम दुधकोर, संजय धुर्वे, नितिन कोरेकर, विठ्ठल पुसदकर, भाऊराव केराम, मनोहर नेजेकर, सुरेश इखार, जयवंता पेंदाम, सुधाकर मरस्कोल्हे, शंकर नेहारे, नानाजी केराम, प्रभाकर देशमुख यांच्या घरावरील छत उडून गेले. गारपीटीमुळे गहू, चना, पालेभाज्या आदी पिकांचे नुकसान झाले. यात गावातील उमेश ठाकूर, प्रविण काटोले, माणिक लांबट, साहेबराव चावरे, गंगाधर घोडखांदे, प्रशांत निवल, मंगेश चौधरी, रंगरावर तळवेकर, सुभाष तळवेकर यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या या भागाची पाहणी करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.