शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी

By admin | Updated: April 25, 2015 00:04 IST

डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया व जॅपनिज एन्सेफेलायटीस (जेई) या आजारांचा समावेश होतो.

जागतिक हिवताप दिन : ‘भविष्यासाठी गुंतवणूक करू या, हिवतापाला हटवू या’राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम वर्धा : डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया व जॅपनिज एन्सेफेलायटीस (जेई) या आजारांचा समावेश होतो. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या डासांमार्फत होत असतो. हिवताप व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच हिवताप नियंत्रण ही शासनासह प्रत्येकाची जबाबदारी आहे.जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनेच्या अमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. ‘भविष्यासाठी गुंतवणूक करू या, हिवतापाला हटवू या’ या म्हणीनुसार प्रत्येकाने सहभाग घेण्याचे आवाहन केले जाते. किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जनतेचा सहभाग आणि सहकार्य घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी जून महिना ‘हिवताप विरोधी जनजागरण महिना’ म्हणून साजरा होतो. जून महिन्यात मान्सूनच्या आगमनासोबतच सर्वत्र डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्येही वाढ होते. या आजारावर मात करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्नशील असते. मात्र शासनाच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहभागाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जाते. लोकसहभागातून प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्याकरिता आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जाते. यात प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देवू नये. खड्डे बूजवावे, साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन लावावे, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक व मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोत्पत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्यांचा वापर करावा. संडासच्या व्हेट पाईपला घरगुती कापड बांधावा व ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत रक्त नमुना तपासून घेण्याचे आवाहन केले जाते. ‘डासांपासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण’ या उक्तीप्रमाणे हिवताप नियंत्रण सुद्धा माणसाच्याच हातात आहे. सर्वाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.(शहर प्रतिनिधी)हिवताप रोगाचा प्रसार अ‍ॅनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. ही मादी एखाद्यास चावल्यास हिवतापाचे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. विशेष म्हणजे अशा व्यक्तीस अन्य डास चावल्यास हिवतापाचे जंतू त्या डासाच्या शरीरात प्रवेश करतात व असा रोगजंतू वाहक डास निरोगी व्यक्तीस चावल्यामुळे हिवतापाचे जंतू लाळेबरोबर निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ८ ते १० दिवसात हिवतापाचे जंतू शरीरात वाढतात व रक्तातील तांबड्या पेशी फुटून रोग्यास ताप येतो.हिवताप या आजारात अचानक थंडीवाजून ताप येतो, अंग दुखणे, डोके दुखणे, ऊलटी होणे, घाम येवून ताप कमी होणे, रोग्याला थकवा येणे व असा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसू येतात. मेंदुच्या हिवतापामध्ये ही लक्षणे तीव्र स्वरूपाची असतात, अशा प्रसंगी हिवतापाचा रोगी बेशुद्ध होवू शकतो व प्रसंगी मृत्यूही पावतो.