शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
3
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
4
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
5
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
6
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
7
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
8
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
9
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
10
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
11
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
12
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
13
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
14
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
15
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
16
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
17
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
18
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
19
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
20
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

साने गुरूजी कथामालेस कृतिमाला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:14 IST

टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले.

ठळक मुद्देअभय बंग : ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले. माझे आई-वडील यात सहभागी झाले आणि आम्ही दोघे भावंडे खानदेशातील एका खेड्यात राहू लागलो. मी सहा वर्षांचा होतो. साने गुरूजींच्या कथेमुळे ती तिथे राहू शकलो, अशी प्रांजळ कबुली देत साने गुरूजींच्या कथामालेला कृतिमाला करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.सेवाग्राम आश्रम परिसरात साने गुरूजी कथामालेच्या ५१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवधूत म्हमाणे तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, प्रा. माधव वझे, लाला पाटील, श्यामराव कराळे, के. गांजरे, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, संघटक डॉ. गजानन कोटेवार, कार्यवाहक शाखा वर्धाचे प्रा. राजेंद्र मुंडे, स्वागताध्यक्ष प्रदीप बजाज, सरपंच रोशना जामलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभय बंग यांनी महात्मा गांधी, सानेगुरूजी व प्रकाश मोहाडीकर यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करून दीप प्रज्वलन केले.विचार व्यक्त करताना डॉ. बंग पूढे म्हणाले की, श्यामची आई मी अजूनही पूर्ण वाचू शकलो नाही. वाचताना मी इतका भावूक झालो आहे. सेवाग्राम हे तिर्थक्षेत्र असल्याने मंदिरात जाताना तशी शुद्धता पाळली जाते. तशीच स्थिती या ठिकाणची आहे. भारतातील सर्व जागेपेक्षा पवित्र जागा वर्धा परिसरात दिसून येईल. रचनात्मक कार्य, संस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. ऐतिहासिक कार्य करणाºया संस्थांची दखल मात्र कुणी घेत नाही, ही शोकांतिका आहे. लंडनला एका घरात धातुच्या एका पट्टीवर राजा रॉय मोहन रॉय राहिले, असे लिहून होते. मग, वर्धा परिसरात असे का दिसत नाही, असा प्रश्न बंग यांनी उपस्थित केला. गिताईचा जन्म झालेले महिला आश्रमातील घर पाहावे म्हणजे लक्षात येईल. कार्य करताना संघटन व बळ हे प्रेरणा स्त्रोतातून मिळते. साने गुरूजींच्या विचारांचा दिवा सतत तेवत ठेवून अधिक व्यापकता येण्यासाठी कार्य करावे. लहान बालकांत व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. कृतीशील नई तालीम व कथामाला यांची सांगड घालून व्यसन कमी कसे करता येईल, यावर कार्य करावे, असा आशावाद ठेवून गुरुजींचे कार्य आणि विचार अखिल भारतात पोहोचविण्यासाठी बंग यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शिवकुमार यांनीही विचार व्यक्त केले. कार्याध्यक्ष म्हमाणे यांनी दिशा देणारे व कृतीशील विचार या परिसरातून आपण घेऊन जाणार आहोत. कथेमालेतून यावर नक्कीच मांडणी करून बालकांना अधिक कौशल्यशिल, संस्कारित बनविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.प्रास्ताविक डॉ. गजानन कोटेवार, भूमिका जयवंत मठकर यांनी केले. परिचय प्रा. राजेंद्र मुंडे यांनी करून दिला. स्वागतपर भाषण प्रदीप बजाज यांनी केले. संचालन सुषमा कोटेवार यांनी केले. स्वागतगीत व पसायदान भैरवी काळे यांनी सादर केले.स्मरणिका व पुस्तकांचे विमोचनडॉ. अभय बंग यांच्या हस्ते यशोदा माता स्मृती शताब्दी मातृ स्मृती ग्रंथ या स्मरणिकेचे, ‘असे घडलो आम्ही’ लेखिका मनीषा कानडे आणि भारतीय संस्कृती यावर भाष्य’ या अण्णा जाधव यांच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. शिवाय विशेष कार्य करणाºयांचा सत्कारही करण्यात आला.