शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

राज्यमार्गाचे डांबरीकरण करा

By admin | Updated: January 10, 2016 02:42 IST

गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

मागणी : हिंगणघाट ते वर्धा रस्त्याची दुरवस्था कायमचवर्धा : गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता राज्य शासनाने या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित नव्याने रूंदीकरणासह संपूर्ण ४५ किमी हिंगणघाट ते वर्धा राज्यमार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अ.भा. किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे यांनी केली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले आहे.हिंगणघाट ते वर्धा या राज्यमार्गाची केवळ डागडुजी करण्यात येते. यात शासनाचे आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले; पण रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. या मार्गावर प्रवास करताना प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. वर्धा ते हिंगणघाट प्रवासही तब्बल दीड तासांचा झाल्याचे दिसून येते. हिंगणघाट ते वर्धा हा महत्त्वाचा मार्ग असून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. वाहनांच्या संख्येत भरमसाढ वाढ झाली असून जिल्ह्यातून महत्त्वाच्या शहरांकडे जाणारा तसेच कारखाने व उद्योगांमुळे जड वाहनांचे आवागमनही वाढले आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांकरिता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी येथे यावे लागते. शिवाय सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात जाणाऱ्या आजारी रुग्णांनाही या दयनीय असलेल्या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्यावर खोल खड्डे असल्याने वाहनांमध्ये बिघाड होणे नित्याचेच झाले आहे. प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या भंगार बसेस तर रस्त्यांवरील खड्ड््यांमुळे प्रवाश्यांना डोकेदुखीच ठरत आहेत. या राज्यमार्गाने दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे; पण ते कुठपर्यंत होणार, याबाबत साशंकताच आहे. वर्धा ते हिंगणघाट या संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)