शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गाचे डांबरीकरण करा

By admin | Updated: January 10, 2016 02:42 IST

गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

मागणी : हिंगणघाट ते वर्धा रस्त्याची दुरवस्था कायमचवर्धा : गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता राज्य शासनाने या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित नव्याने रूंदीकरणासह संपूर्ण ४५ किमी हिंगणघाट ते वर्धा राज्यमार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अ.भा. किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे यांनी केली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले आहे.हिंगणघाट ते वर्धा या राज्यमार्गाची केवळ डागडुजी करण्यात येते. यात शासनाचे आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले; पण रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. या मार्गावर प्रवास करताना प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. वर्धा ते हिंगणघाट प्रवासही तब्बल दीड तासांचा झाल्याचे दिसून येते. हिंगणघाट ते वर्धा हा महत्त्वाचा मार्ग असून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. वाहनांच्या संख्येत भरमसाढ वाढ झाली असून जिल्ह्यातून महत्त्वाच्या शहरांकडे जाणारा तसेच कारखाने व उद्योगांमुळे जड वाहनांचे आवागमनही वाढले आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांकरिता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी येथे यावे लागते. शिवाय सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात जाणाऱ्या आजारी रुग्णांनाही या दयनीय असलेल्या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्यावर खोल खड्डे असल्याने वाहनांमध्ये बिघाड होणे नित्याचेच झाले आहे. प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या भंगार बसेस तर रस्त्यांवरील खड्ड््यांमुळे प्रवाश्यांना डोकेदुखीच ठरत आहेत. या राज्यमार्गाने दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे; पण ते कुठपर्यंत होणार, याबाबत साशंकताच आहे. वर्धा ते हिंगणघाट या संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)