शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

राज्यमार्गाचे डांबरीकरण करा

By admin | Updated: January 10, 2016 02:42 IST

गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

मागणी : हिंगणघाट ते वर्धा रस्त्याची दुरवस्था कायमचवर्धा : गत काही वर्षांपासून हिंगणघाट ते वर्धा या ४५ किमी अंतर असलेल्या वर्दळीच्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता राज्य शासनाने या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित नव्याने रूंदीकरणासह संपूर्ण ४५ किमी हिंगणघाट ते वर्धा राज्यमार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अ.भा. किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे यांनी केली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले आहे.हिंगणघाट ते वर्धा या राज्यमार्गाची केवळ डागडुजी करण्यात येते. यात शासनाचे आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले; पण रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. या मार्गावर प्रवास करताना प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. वर्धा ते हिंगणघाट प्रवासही तब्बल दीड तासांचा झाल्याचे दिसून येते. हिंगणघाट ते वर्धा हा महत्त्वाचा मार्ग असून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. वाहनांच्या संख्येत भरमसाढ वाढ झाली असून जिल्ह्यातून महत्त्वाच्या शहरांकडे जाणारा तसेच कारखाने व उद्योगांमुळे जड वाहनांचे आवागमनही वाढले आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांकरिता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी येथे यावे लागते. शिवाय सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात जाणाऱ्या आजारी रुग्णांनाही या दयनीय असलेल्या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. हिंगणघाट ते वर्धा या रस्त्यावर खोल खड्डे असल्याने वाहनांमध्ये बिघाड होणे नित्याचेच झाले आहे. प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या भंगार बसेस तर रस्त्यांवरील खड्ड््यांमुळे प्रवाश्यांना डोकेदुखीच ठरत आहेत. या राज्यमार्गाने दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे; पण ते कुठपर्यंत होणार, याबाबत साशंकताच आहे. वर्धा ते हिंगणघाट या संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)