शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

ओबीसी शिष्यवृत्तीसाठी मर्यादा सहा लाख करा

By admin | Updated: May 8, 2016 02:41 IST

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे.

महात्मा फुले समता परिषदेचे पालकमंत्र्यांना साकडेवर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व पक्षीय आमदारांनी ११ डिसेंबर २०१३ ला नागपूर अधिवेशनात लक्षवेधी लावत शासन निर्णय मंजूर करवून घेतला; पण तो आदेश निघाला नाही. आता भाजपचे सरकार असल्याने ३१ मे पर्यंत शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली. याबाबत शुक्रवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.विधानसभेची पाच अधिवेशने झाली. प्रत्येक अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री सहा लाखाचा शासन निर्णय काढणार, अशी ग्वाही देतात. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेच सांगत आहे; पण सहा लाखाचा शासन निर्णय अद्याप निघाला नाही. आता तर शाळा, महाविद्यालयाचे नवीन सत्रातील प्रवेश सुरू होत आहे. अशावेळी हा शासन निर्णय निघाला नाही तर पुन्हा ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. शासनाची ओबीसींप्रती नियत चांगली असेल तर ३१ मे २०१६ पर्यंत शासनाने सहा लाखाचा शासन निर्णय काढावा. अन्यथा या घोषणा ओबीसीची फसवणूक करणाऱ्या आहेत, असे समजून १ जूनपासून महात्मा फुले समता परीषद, ओबीसी संघटना व ओबीसींची शिष्यवृत्ती आंदोलन सुरू करेल. त्याचा पहिला बँडबाजा चंद्रपूर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर पुन्हा दुसऱ्यांदा वाजविला जाईल, असा इशाराही निवेदनातून महात्मा फुले समता परिषदेने दिला. ओबीसी विद्यार्थ्यांच्या १०० टक्के शिष्यवृत्तीसाठीसुद्धा असेच संभ्रमित व बेकायदेशीर परिपत्रके, शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाद्वारे काढण्यात आले. वास्तविक, केंद्र शासन शिष्यवृत्तीबाबत विविध प्रवर्गात भेदभाव करीत नाही, असे असताना ओबीसींना एससी, एस.टी. प्रमाणे मिळणारी १०० टक्के शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती कोणतेही कारण न देता ५० टक्के करीत ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला. यासाठी मुख्यमंत्री, कृषीमंत्री व अर्थमंत्री यांनी विरोधात असताना २० डिसेंबर २०१३ रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनाही एस.सी., एस.टी. प्रमाणेच १०० शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती मिळावी म्हणून नागपूर अधिवेशनात लक्षवेधी लावली होती. त्यावेळी ती फेटाळली होती; पण ओबीसींना शिष्यवृत्तीसाठी आश्वासने देऊन सत्तेत आलेली ही मंडळीदेखील टाळाटाळ करीत आहे. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. ओबीसी शिष्यवृत्तीबाबत अन्याय करणारे निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारचे पातक असल्याचे मत भाजपची मंडळी व आजचे मुख्यमंत्री व्यक्त करीत होते. आता सहा लाखाच्या शासन निर्णयाचे व ओबीसी विद्यार्थ्यांच्या १०० टक्के शिष्यवृत्तीचे पापही फडणवीस सरकारने धुवून काढावे, अशी मागणीही महात्मा फुले समता परिषदेने केली. अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, केशव तितरे, भरत चौधरी, वासुदेव ढुमणे, अभय पुसदकर, सुरेश सातोकर, संजय म्हसके, संजय भगत व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)