शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:07 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. जमिनीतील ओलावा पूर्वी सारखा नसल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना आक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नैसर्गीक पानवटेही अल्पावधीत आटणार आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अल्प पावसाचा विविध शेत पिकांना फटका बसला असून सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय कपाशी आणि तूर हे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करून वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा तसेच शेतकºयांना सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, अमृत मडावी, रमेश खेडकर, ज्ञानेश्वर वैद्य, भक्तराज अलोणे आदींची उपस्थिती होती.