शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:07 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. जमिनीतील ओलावा पूर्वी सारखा नसल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना आक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नैसर्गीक पानवटेही अल्पावधीत आटणार आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अल्प पावसाचा विविध शेत पिकांना फटका बसला असून सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय कपाशी आणि तूर हे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करून वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा तसेच शेतकºयांना सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, अमृत मडावी, रमेश खेडकर, ज्ञानेश्वर वैद्य, भक्तराज अलोणे आदींची उपस्थिती होती.