शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:07 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. जमिनीतील ओलावा पूर्वी सारखा नसल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना आक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नैसर्गीक पानवटेही अल्पावधीत आटणार आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अल्प पावसाचा विविध शेत पिकांना फटका बसला असून सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय कपाशी आणि तूर हे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करून वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा तसेच शेतकºयांना सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, अमृत मडावी, रमेश खेडकर, ज्ञानेश्वर वैद्य, भक्तराज अलोणे आदींची उपस्थिती होती.