शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

भारनियमनाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:16 IST

येथील शेतकºयांच्या कृषीपंपाना नवीन वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कनिष्ठ अभियंत्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : येथील शेतकºयांच्या कृषीपंपाना नवीन वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. शेतकरी हित जोपासून सुरू केलेले भारनियमन बंद करावे तसे न होत असल्यास नवीन वेळापत्रक रद्द करून जुन्याच वेळापत्रकाप्रमाणे भारनियमन करावे, अशी मागणी शेतकºयांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता गुप्ता यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.विजयगोपाल विद्युत पॉवर स्टेशनने नवीन पद्धतीने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकºयांना पिकांना रात्रीला पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या सुमारास शेतपिकांना पाणी देणे हे धोक्याचे ठरते. विजयगोपाल पॉवर स्टेशन अंतर्गत कृषीपंपांना विद्युत पुरवठा करण्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याने शेतकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.पूर्वीचे वेळापत्रक काहीसे दिलासा देणारे होते. त्यामुळे तेही महावितरणच्या अधिकाºयांनी कायम ठेवल्यास शेतकºयांना काहीसे चालेल असेही निवेदनात नमुद आहे. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देताना वासुदेव वाकाडे, देविदास अवसरे, दिलीप श्रीराव, विपीन अवसरे, प्रवीण डडमल, राहुल पटेकर, नानाजी हजारे, विजय पेटकर, जगन हजारे, अब्दुल नबी गुलाम नबी, विश्वनाथ ढांगे आदी उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास रस्ता रोको आंदोलनमहावितरणच्यावतीने सुरू करण्यात आलेले भारनियमन बंद करावे अथवा शेतकरी हितार्थ निर्णय घेत भारनियमनाच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल करावा या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकºयांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता गुप्ता यांना सादर केले आहे. सदर निवेदनाची प्रत उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनाही पाठविण्यात आली आहे. शेतकºयांच्या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास शेतकरी एकत्र येत महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.