शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील सरकारी वकील कायम ठेवा

By admin | Updated: June 29, 2016 02:08 IST

शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील....

विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील म्हणून असलेला कार्यकाळ संपला आहे. सदर प्रकरण निकालावर येईपर्यंत किमान या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे. रूपेश मुळे नरबळी प्रकरण वर्धा शहरच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजले आहे. एका नऊ वर्षीय बालकाच्या शरीराच्या काही अंगाचे तुकडे करून मांत्रिकाने भाजून खाल्ल्याची ही घटना आहे. या प्रकरणी अ‍ॅड. श्याम दुबे यांनी जोरकसपणे बाजू मांडली. त्यामुळे आरोपीस योग्य शिक्षा होईल, असे संकेत असताना त्यातून त्यांना काढून दुसऱ्या वकीलांना बाजू मांडण्यास सांगितल्या गेले. यामुळे या प्रकरणात शंका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी अ‍ॅड. श्याम दुबे यांनाच पुन्हा नियुक्त करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात शारदा झामरे, प्रा. नुतन माळवी, गजेंद्र सुरकार, सुधीर पांगुळ, विल्सन मोखाडे, भीमसेन गोटे आदींसह नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. शहरात सप्टेंबर २०१५ मध्ये आर्वी नाका परिसरातील रूपेश मुळे याचा नरबळी दिल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. सदर प्रकरण सुरू असताना सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांनी न्यायालयात ते मांडले. येत्या ३० जून रोजी या प्रकरणातील मुख्य साक्षदार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष असताना अ‍ॅड. श्याम दुबे यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांच्या जागी दुसरे सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. मात्र अ‍ॅड. दुबे यांनी प्रकरणाची पुरेपूर माहिती असून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांची नियुक्ती पुन्हा करावी, असे निवेदन सोमवारी सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती निवेदन सादरकर्त्यांनी दिली. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)