शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील सरकारी वकील कायम ठेवा

By admin | Updated: June 29, 2016 02:08 IST

शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील....

विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील म्हणून असलेला कार्यकाळ संपला आहे. सदर प्रकरण निकालावर येईपर्यंत किमान या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे. रूपेश मुळे नरबळी प्रकरण वर्धा शहरच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजले आहे. एका नऊ वर्षीय बालकाच्या शरीराच्या काही अंगाचे तुकडे करून मांत्रिकाने भाजून खाल्ल्याची ही घटना आहे. या प्रकरणी अ‍ॅड. श्याम दुबे यांनी जोरकसपणे बाजू मांडली. त्यामुळे आरोपीस योग्य शिक्षा होईल, असे संकेत असताना त्यातून त्यांना काढून दुसऱ्या वकीलांना बाजू मांडण्यास सांगितल्या गेले. यामुळे या प्रकरणात शंका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी अ‍ॅड. श्याम दुबे यांनाच पुन्हा नियुक्त करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात शारदा झामरे, प्रा. नुतन माळवी, गजेंद्र सुरकार, सुधीर पांगुळ, विल्सन मोखाडे, भीमसेन गोटे आदींसह नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. शहरात सप्टेंबर २०१५ मध्ये आर्वी नाका परिसरातील रूपेश मुळे याचा नरबळी दिल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. सदर प्रकरण सुरू असताना सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांनी न्यायालयात ते मांडले. येत्या ३० जून रोजी या प्रकरणातील मुख्य साक्षदार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष असताना अ‍ॅड. श्याम दुबे यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांच्या जागी दुसरे सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. मात्र अ‍ॅड. दुबे यांनी प्रकरणाची पुरेपूर माहिती असून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांची नियुक्ती पुन्हा करावी, असे निवेदन सोमवारी सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती निवेदन सादरकर्त्यांनी दिली. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)