शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वर्ध्यातील ‘एमगिरी’मुळे राज्यभरात रोजगाराचे दालन खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 14:56 IST

mahatma gandhi institute of rural industrialization : संस्थेचे रुपांतर कौशल्य विकास विद्यापीठात करण्यात यावे तसेच मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले संचालकाचे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली.

ठळक मुद्देडॉ. पंकज भोयर यांची केंद्रीय मंत्री राणे यांच्यासोबत चर्चा

वर्धा : ‘गावाकडे चला’ असा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतूनच वर्ध्यात महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेची (एमगिरी) निर्मिती करण्यात आली. येथून ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी युवकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने ‘एमगिरी’चे रूपांतर कौशल्य विकास विद्यापीठात केले तर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याजवळ व्यक्त करून सविस्तर चर्चाही केली.

वर्धा येथे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था कार्यरत आहे. या संस्थेत मुख्यत: विविध लघुउद्योग सुरू करण्याबाबत प्रशिक्षण तसेच मोठ्या व मध्यम उद्योगात काम करण्याकरीता लोकांना प्रशिक्षण देण्यासोबतच तांत्रिक मदत करणारे उपक्रम राबविले जातात. संस्थेला शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येतात. वर्धा जिल्ह्याचे दृष्टीने जिल्ह्यात संस्था असणे ही बाब भूषणावह आहे. संस्था विकसित झाल्यास संस्थेतून जिल्ह्यातील अनेकांना मोठ-मोठ्या उद्योगात रोजगार मिळू शकेल व अनेकांना स्वत:चे उद्योग सुरू करता येतील. हे सर्व उद्योग लघुउद्योग असल्याने अल्पशा भांडवलावरही सुरू होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच युवकांना स्वयंरोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेचे रुपांतर कौशल्य विकास विद्यापीठात करण्यात यावे तसेच मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले संचालकाचे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. यावेळी आमदार नीतेश राणे उपस्थित होते.

पायाभूत सुविधांसाठी १०० कोटींचे अनुदान द्यावे

संस्था परिसर व प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, संस्थेंतर्गत चालणाऱ्या उपक्रमात सुधारणा, नवनवीन अद्यावत सोयीसुविधा निर्माण करणे व जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे तसेच महिला व पुरुषांच्या प्रशिक्षणाकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करणे गरजेचे आहे. या पायाभूत सुविधांसाठी संस्थेला १०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आ. भोयर यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे wardha-acवर्धा