शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वर्ध्यातील ‘एमगिरी’मुळे राज्यभरात रोजगाराचे दालन खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 14:56 IST

mahatma gandhi institute of rural industrialization : संस्थेचे रुपांतर कौशल्य विकास विद्यापीठात करण्यात यावे तसेच मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले संचालकाचे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली.

ठळक मुद्देडॉ. पंकज भोयर यांची केंद्रीय मंत्री राणे यांच्यासोबत चर्चा

वर्धा : ‘गावाकडे चला’ असा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतूनच वर्ध्यात महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेची (एमगिरी) निर्मिती करण्यात आली. येथून ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी युवकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने ‘एमगिरी’चे रूपांतर कौशल्य विकास विद्यापीठात केले तर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याजवळ व्यक्त करून सविस्तर चर्चाही केली.

वर्धा येथे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था कार्यरत आहे. या संस्थेत मुख्यत: विविध लघुउद्योग सुरू करण्याबाबत प्रशिक्षण तसेच मोठ्या व मध्यम उद्योगात काम करण्याकरीता लोकांना प्रशिक्षण देण्यासोबतच तांत्रिक मदत करणारे उपक्रम राबविले जातात. संस्थेला शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येतात. वर्धा जिल्ह्याचे दृष्टीने जिल्ह्यात संस्था असणे ही बाब भूषणावह आहे. संस्था विकसित झाल्यास संस्थेतून जिल्ह्यातील अनेकांना मोठ-मोठ्या उद्योगात रोजगार मिळू शकेल व अनेकांना स्वत:चे उद्योग सुरू करता येतील. हे सर्व उद्योग लघुउद्योग असल्याने अल्पशा भांडवलावरही सुरू होऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच युवकांना स्वयंरोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेचे रुपांतर कौशल्य विकास विद्यापीठात करण्यात यावे तसेच मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले संचालकाचे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. यावेळी आमदार नीतेश राणे उपस्थित होते.

पायाभूत सुविधांसाठी १०० कोटींचे अनुदान द्यावे

संस्था परिसर व प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, संस्थेंतर्गत चालणाऱ्या उपक्रमात सुधारणा, नवनवीन अद्यावत सोयीसुविधा निर्माण करणे व जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे तसेच महिला व पुरुषांच्या प्रशिक्षणाकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करणे गरजेचे आहे. या पायाभूत सुविधांसाठी संस्थेला १०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आ. भोयर यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे wardha-acवर्धा