शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Maharashtra Election 2019 ; दिवाळीच्या थिमवर मतदान केंद्रांवर होणार मतदारांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रांना रांगोळ्या तसेच विविध डेकोरेटिव्ह साधनांनी सजविले आहे.

ठळक मुद्देस्वागतासाठी रांगोळ्या, पुष्प व मिठाई : मतदान केंद्रांची आकर्षक सजावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाहीचा महाउत्सव २१ ऑक्टोबरला साजरा होत आहे. महाराष्ट्र विधानसभा विनडणुकीसाठी सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात होणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी अवघा महाराष्ट्र मतदान करणार आहे. मतदारांच्या स्वागतासाठी वर्धा जिल्हा मागे नसून जिल्ह्यातील ४० केंद्रांवर मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे रांगोळ्या, गुलाबपुष्प व मिठाई देऊन दिवाळीच्या थिमवर स्वागत करण्यात येणार आहे.मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रांना रांगोळ्या तसेच विविध डेकोरेटिव्ह साधनांनी सजविले आहे. मतदान केंद्राच्या दारावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी येणाºया प्रथम मतदाराचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची जबाबदारी संचालिका स्वाती वानखेडे सांभाळत आहेत. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असून महिला बचतगटाच्या सदस्य गणवेशात मतदारांच्या स्वागतासाठी हजर असणार आहेत. यासोबत दिव्यांग मतदार, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला इत्यादींचे स्वागत होणार असून त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्यक असणार आहेत. त्याचप्रमाणे चार विधासभा क्षेत्रात ६ सखी मतदान केंद्रे, ५ आदर्श मतदान केंद्र मतदारांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत. सखी मतदान केंद्रे महिला अधिकारी कर्मचारीद्वारा संचालित असणार आहेत. यात पंचायत समिती सभागृह कारंजा, जिल्हा परिषद मुलींची शाळा खोली क्रमांक ७, आर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र.३ पुलगाव, नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल नगर परिषद नवीन इमतारत पुलगाव, सेंट जॉन हायस्कूल हिंगणघाट व जिल्हा परिषद इमारत सभागृह वर्धा यांचा समावेश आहे. यावेळी दिव्यांग मतदान केंद्र ही संकल्पनासुद्धा तीन केंद्रांवर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात १३९ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे व प्रोत्साहित करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत. मतदारांनी स्वागताचा स्वीकार करावा व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, सीईओ डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नलोकसभा निवडणुकीत झालेली कमी मतदान लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध उपाययोजना केल्या आहेत. विविध शाळांच्या माध्यमातून मतदारांत जनजागृती, चुनावी पाठशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले. मतदारांनी उत्साहाने मतदान करावे यासाठी नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा