शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Election 2019 ; सहा पदव्युत्तर तर पाच अंडरग्रॅज्युएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देप्रमुख उमेदवारांची शैक्षणिक पात्रता : पंकज भोयर आचार्य तर समीर देशमुख अभियांत्रिकी पदवी प्राप्त

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळविण्याकरिता बारावी उत्तीर्ण हवे; पण राजकारणात शिक्षणाची कोणतीही अट नसल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची ओरड नेहमीच मतदारांकडून केली जाते.पण, यावर्षी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे उच्च अंडरग्रॅज्युएट तर सहा उमेदवार हे पदव्युत्तर आहेत.यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्जाच्या छाननीनंतर ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व उमेदवारांपैकी चारही मतदारसंघातील ११ प्रमुख उमेदवारांच्या शपथपत्रावरून शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला आहे. यात वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीतील काँग्रेसचे रणजित कांबळे, शिवसेनेचे समीर देशमुख, अपक्ष राजेश बकाने, हिंगणघाटमधील भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी. तर आर्वी मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे व भाजपचे दादाराव केचे यांचा समावेश आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये सहा उमेदवार पदव्युत्तर असून त्यात डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर देशमुख, सुधीर कोठारी, राजू तिमांडे व दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर उर्वरित पाच उमेदवार हे बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट आहेत.उच्चशिक्षितांचा वाढतोय कलजिल्ह्यातील चारही मतदार संघातील प्रमुख उमेदवारांपैकी प्रत्येक मतदार संघातून एक ते दोन उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उच्चशिक्षितांचाही राजकारणाकडे कल वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयर