शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maharashtra Election 2019 ; सहा पदव्युत्तर तर पाच अंडरग्रॅज्युएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देप्रमुख उमेदवारांची शैक्षणिक पात्रता : पंकज भोयर आचार्य तर समीर देशमुख अभियांत्रिकी पदवी प्राप्त

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळविण्याकरिता बारावी उत्तीर्ण हवे; पण राजकारणात शिक्षणाची कोणतीही अट नसल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची ओरड नेहमीच मतदारांकडून केली जाते.पण, यावर्षी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे उच्च अंडरग्रॅज्युएट तर सहा उमेदवार हे पदव्युत्तर आहेत.यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्जाच्या छाननीनंतर ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व उमेदवारांपैकी चारही मतदारसंघातील ११ प्रमुख उमेदवारांच्या शपथपत्रावरून शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला आहे. यात वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीतील काँग्रेसचे रणजित कांबळे, शिवसेनेचे समीर देशमुख, अपक्ष राजेश बकाने, हिंगणघाटमधील भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी. तर आर्वी मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे व भाजपचे दादाराव केचे यांचा समावेश आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये सहा उमेदवार पदव्युत्तर असून त्यात डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर देशमुख, सुधीर कोठारी, राजू तिमांडे व दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर उर्वरित पाच उमेदवार हे बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट आहेत.उच्चशिक्षितांचा वाढतोय कलजिल्ह्यातील चारही मतदार संघातील प्रमुख उमेदवारांपैकी प्रत्येक मतदार संघातून एक ते दोन उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उच्चशिक्षितांचाही राजकारणाकडे कल वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयर