शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Maharashtra Election 2019 ; सहा पदव्युत्तर तर पाच अंडरग्रॅज्युएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देप्रमुख उमेदवारांची शैक्षणिक पात्रता : पंकज भोयर आचार्य तर समीर देशमुख अभियांत्रिकी पदवी प्राप्त

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळविण्याकरिता बारावी उत्तीर्ण हवे; पण राजकारणात शिक्षणाची कोणतीही अट नसल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची ओरड नेहमीच मतदारांकडून केली जाते.पण, यावर्षी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे उच्च अंडरग्रॅज्युएट तर सहा उमेदवार हे पदव्युत्तर आहेत.यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्जाच्या छाननीनंतर ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व उमेदवारांपैकी चारही मतदारसंघातील ११ प्रमुख उमेदवारांच्या शपथपत्रावरून शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला आहे. यात वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीतील काँग्रेसचे रणजित कांबळे, शिवसेनेचे समीर देशमुख, अपक्ष राजेश बकाने, हिंगणघाटमधील भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी. तर आर्वी मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे व भाजपचे दादाराव केचे यांचा समावेश आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये सहा उमेदवार पदव्युत्तर असून त्यात डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर देशमुख, सुधीर कोठारी, राजू तिमांडे व दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर उर्वरित पाच उमेदवार हे बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट आहेत.उच्चशिक्षितांचा वाढतोय कलजिल्ह्यातील चारही मतदार संघातील प्रमुख उमेदवारांपैकी प्रत्येक मतदार संघातून एक ते दोन उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उच्चशिक्षितांचाही राजकारणाकडे कल वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयर