शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात विकासासाठी परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देवळी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास मागील २० वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. लोकप्रतिनिधींचे ...

ठळक मुद्देखासदार तडस : विविध गावांमध्ये जाहीर सभा व बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास मागील २० वर्षांपासून पूर्णपणे रखडला आहे. लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत असून विकासाच्या आशेवर असलेला मतदार यावेळी परिवर्तन घडवून आणेल व विधानसभेत शिवसेना भाजपचा भगवा या मतदारसंघातून जाईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ खासदार रामदास तडस यांच्या शुक्रवारी आंजी (मोठी), वायफड, गुंजखेडा, इंझाळा, भिडी, अंदोरी, कानगाव, अल्लीपूर, वायगाव, तरोडा या गावांमध्ये बैठका व जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी खासदार रामदास तडस बोलत होते.रामदास तडस म्हणाले, भाजप शिवसेना सरकारच्या काळात आपण संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा विकास केला. देवळी गावात अनेक योजना आणून या गावाचा चेहरामोहरा बदलविला. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. त्यांचे विकासाकडे दुर्लक्ष आहे. निवडून गेल्यानंतर साडेचार वर्षांनंतरच त्यांचे दर्शन मतदारांना होते, अशी टीका खा. तडस यांनी केली. समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागातील या दौऱ्याला मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. गावागावांत ‘समीर देशमुख आगे बढो’चे नारे कार्यकर्ते देत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, भाजपचे नेते मिलिंद भेंडे, पंकज घोडमारे यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देवळी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी नवे नेतृत्व विधानसभेत पाठवा, असे आवाहन शहागडकर व भेंडे यांनी जाहीर सभांमधून केले.

टॅग्स :wardha-acवर्धाRamdas Tadasरामदास तडस