शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसमीर देशमुख यांचे आवाहन : विविध गावांमध्ये मतदारांशी साधला थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या ४० वर्षांत देवळी-पुलगाव मतदारसंघामध्ये मूलभूत सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन करण्याची संधी चालून आली आहे, ही संधी गमावू नका, असे आवाहन देवळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी केले.देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.ही शिकलेली मुले ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतील, असा मला विश्वास आहे. मागील २० वर्षांपासून कॉँग्रेसच्या आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केले, हे जनतेने आता ओळखले पाहिजे. एका नव्या पर्वाची सुरुवात या निवडणुकीच्या निमित्ताने केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे बाळा शहागडकर, अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचिन भिरे, सुरेश डफळे, डिगडोह जि.प. सदस्य मयुरी मसराम, प्रवीण येसनखेडे, सुभाष कुरंजेकर, पुरुषोत्तम भोगेकर, भगवान मोडक, गोपाल कुरंजेकर, किसान जबडे, खतेश्वर येसनखेडे, ईसापूरचे सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंच नितीन करपते, सदस्य विनय महाजन, चंदू गोहे, संदीप ढगे, प्रफुल्ल कारमोरे, रत्नापूरचे सुधीर बोबडे, गुणवंत खडसे, गजानन राऊत, सागर कडू, बाबाराव खडसे, साहेबराव सायंकार, किशोर मुडे, खुशाल आकरे यांच्यासह शिवसेना व भाजपचे सर्व पदाधिकारी, गावकऱ्यांची प्रचार रॅली व बैठकीत उपस्थिती होती.व्यापाऱ्यांशी साधला समीर देशमुखांनी संवादपुलगाव- देवळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी पुलगाव येथे प्रचारफेरी काढून व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी व्यापारी बांधवांनी समीर देशमुख यांना राजकीय आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत. आपले आजोबा बापूरावजी देशमुख, वडील माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. दाआजी नेहमी देवळी-पुलगाव भागाशी जुळलेले होते. त्यांच्यासाठी हा भाग या भागातील लोक परिवारासारखे होते, अशी भावना अनेक जुन्या व्यापाºयांनी व्यक्त केली. आपणही आमच्यासाठी निश्चितपणे काम कराल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौºयाच्या निमित्ताने पुलगाव येथील अनेक व्यापाºयांनी ऋणानुबंधांना नव्याने उजाळा दिला. अनेक व्यापाºयांनी या भागातील त्यांच्या अडचणी समीर देशमुख यांच्या कानी घातल्या. यावेळी संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, देवळी-पुलगाव मतदारसंघाचे समन्वयक रविकांत बालपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :wardha-acवर्धा