शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसमीर देशमुख यांचे आवाहन : विविध गावांमध्ये मतदारांशी साधला थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या ४० वर्षांत देवळी-पुलगाव मतदारसंघामध्ये मूलभूत सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन करण्याची संधी चालून आली आहे, ही संधी गमावू नका, असे आवाहन देवळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी केले.देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.ही शिकलेली मुले ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतील, असा मला विश्वास आहे. मागील २० वर्षांपासून कॉँग्रेसच्या आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केले, हे जनतेने आता ओळखले पाहिजे. एका नव्या पर्वाची सुरुवात या निवडणुकीच्या निमित्ताने केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे बाळा शहागडकर, अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचिन भिरे, सुरेश डफळे, डिगडोह जि.प. सदस्य मयुरी मसराम, प्रवीण येसनखेडे, सुभाष कुरंजेकर, पुरुषोत्तम भोगेकर, भगवान मोडक, गोपाल कुरंजेकर, किसान जबडे, खतेश्वर येसनखेडे, ईसापूरचे सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंच नितीन करपते, सदस्य विनय महाजन, चंदू गोहे, संदीप ढगे, प्रफुल्ल कारमोरे, रत्नापूरचे सुधीर बोबडे, गुणवंत खडसे, गजानन राऊत, सागर कडू, बाबाराव खडसे, साहेबराव सायंकार, किशोर मुडे, खुशाल आकरे यांच्यासह शिवसेना व भाजपचे सर्व पदाधिकारी, गावकऱ्यांची प्रचार रॅली व बैठकीत उपस्थिती होती.व्यापाऱ्यांशी साधला समीर देशमुखांनी संवादपुलगाव- देवळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी पुलगाव येथे प्रचारफेरी काढून व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी व्यापारी बांधवांनी समीर देशमुख यांना राजकीय आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत. आपले आजोबा बापूरावजी देशमुख, वडील माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. दाआजी नेहमी देवळी-पुलगाव भागाशी जुळलेले होते. त्यांच्यासाठी हा भाग या भागातील लोक परिवारासारखे होते, अशी भावना अनेक जुन्या व्यापाºयांनी व्यक्त केली. आपणही आमच्यासाठी निश्चितपणे काम कराल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौºयाच्या निमित्ताने पुलगाव येथील अनेक व्यापाºयांनी ऋणानुबंधांना नव्याने उजाळा दिला. अनेक व्यापाºयांनी या भागातील त्यांच्या अडचणी समीर देशमुख यांच्या कानी घातल्या. यावेळी संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, देवळी-पुलगाव मतदारसंघाचे समन्वयक रविकांत बालपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :wardha-acवर्धा