शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसमीर देशमुख यांचे आवाहन : विविध गावांमध्ये मतदारांशी साधला थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या ४० वर्षांत देवळी-पुलगाव मतदारसंघामध्ये मूलभूत सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन करण्याची संधी चालून आली आहे, ही संधी गमावू नका, असे आवाहन देवळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी केले.देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.ही शिकलेली मुले ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतील, असा मला विश्वास आहे. मागील २० वर्षांपासून कॉँग्रेसच्या आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केले, हे जनतेने आता ओळखले पाहिजे. एका नव्या पर्वाची सुरुवात या निवडणुकीच्या निमित्ताने केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे बाळा शहागडकर, अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचिन भिरे, सुरेश डफळे, डिगडोह जि.प. सदस्य मयुरी मसराम, प्रवीण येसनखेडे, सुभाष कुरंजेकर, पुरुषोत्तम भोगेकर, भगवान मोडक, गोपाल कुरंजेकर, किसान जबडे, खतेश्वर येसनखेडे, ईसापूरचे सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंच नितीन करपते, सदस्य विनय महाजन, चंदू गोहे, संदीप ढगे, प्रफुल्ल कारमोरे, रत्नापूरचे सुधीर बोबडे, गुणवंत खडसे, गजानन राऊत, सागर कडू, बाबाराव खडसे, साहेबराव सायंकार, किशोर मुडे, खुशाल आकरे यांच्यासह शिवसेना व भाजपचे सर्व पदाधिकारी, गावकऱ्यांची प्रचार रॅली व बैठकीत उपस्थिती होती.व्यापाऱ्यांशी साधला समीर देशमुखांनी संवादपुलगाव- देवळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी पुलगाव येथे प्रचारफेरी काढून व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी व्यापारी बांधवांनी समीर देशमुख यांना राजकीय आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत. आपले आजोबा बापूरावजी देशमुख, वडील माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. दाआजी नेहमी देवळी-पुलगाव भागाशी जुळलेले होते. त्यांच्यासाठी हा भाग या भागातील लोक परिवारासारखे होते, अशी भावना अनेक जुन्या व्यापाºयांनी व्यक्त केली. आपणही आमच्यासाठी निश्चितपणे काम कराल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौºयाच्या निमित्ताने पुलगाव येथील अनेक व्यापाºयांनी ऋणानुबंधांना नव्याने उजाळा दिला. अनेक व्यापाºयांनी या भागातील त्यांच्या अडचणी समीर देशमुख यांच्या कानी घातल्या. यावेळी संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, देवळी-पुलगाव मतदारसंघाचे समन्वयक रविकांत बालपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :wardha-acवर्धा