शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

ठळक मुद्देआर्वीच्या सभेत राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : काँग्रेस सत्तेत असताना गरिबांच्या खिशात पैसा पोहोचविण्याचे उदार धोरण अवलंबिले होते. नरेंद्र मोदींचे भाजप सरकार सत्तेत येताच त्यांनी गरिबांना थेट लाभ मिळवून देणारी मनरेगा योजना, जमीन अधिग्रहण कायदा, नोटबंदीसारखे कठोर निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. त्यामुळे आलेल्या मंदीच्या सावटाने देशात चाळीस वर्षांतील बेरोजगारीपेक्षा जास्त बेरोजगारी या पाच वर्षांत वाढली आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले.आर्वी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सभा समन्वयक रवींद्र दरेकर, जिया पटेल, अमर काळे, शेखर शेंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने समाजातील सर्व घटकांची फसवणूक केली आहे. सरकारला या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करीत भाजपने शेतकऱ्याचे पीक विम्याचे ११०० हजार कोटी खासगी कंपन्यांना वाटले. शेतकरी कर्जमाफीची भाषा अजूनही सुरूच असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील ५२ टक्के एमआयडीसी आर्थिक मंदीमुळे बंद पडल्या. विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. चारशे रुपयांत मिळणारे सिलिंडर भाजप सरकारच्या काळात सातशे रुपयांवर पोहोचले. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचा पैसा हडप करून विमा कंपन्यांचे घर भरल्याने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघात काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन रियाज अन्सारी यांनी केले. सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.राहुल गांधींच्या सभेला रणजित कांबळेंची दांडीवर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी व वर्धा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आर्वी येथे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात होत असलेल्या या राष्ट्रीय नेत्याच्या सभेला देवळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित कांबळे यांनी दांडी मारली. या त्यांच्या अनुपस्थितीती चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. रणजित कांबळे राष्ट्रीय नेत्याच्या सभेला गैरहजर राहिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांच्या भगिनी अ‍ॅड. चारूलता राव टोकस या राहुल गांधी यांच्या सभेला आवर्जून उपस्थित होत्या.

टॅग्स :wardha-acवर्धाRahul Gandhiराहुल गांधी