शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

ठळक मुद्देआर्वीच्या सभेत राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : काँग्रेस सत्तेत असताना गरिबांच्या खिशात पैसा पोहोचविण्याचे उदार धोरण अवलंबिले होते. नरेंद्र मोदींचे भाजप सरकार सत्तेत येताच त्यांनी गरिबांना थेट लाभ मिळवून देणारी मनरेगा योजना, जमीन अधिग्रहण कायदा, नोटबंदीसारखे कठोर निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. त्यामुळे आलेल्या मंदीच्या सावटाने देशात चाळीस वर्षांतील बेरोजगारीपेक्षा जास्त बेरोजगारी या पाच वर्षांत वाढली आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले.आर्वी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सभा समन्वयक रवींद्र दरेकर, जिया पटेल, अमर काळे, शेखर शेंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने समाजातील सर्व घटकांची फसवणूक केली आहे. सरकारला या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करीत भाजपने शेतकऱ्याचे पीक विम्याचे ११०० हजार कोटी खासगी कंपन्यांना वाटले. शेतकरी कर्जमाफीची भाषा अजूनही सुरूच असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील ५२ टक्के एमआयडीसी आर्थिक मंदीमुळे बंद पडल्या. विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. चारशे रुपयांत मिळणारे सिलिंडर भाजप सरकारच्या काळात सातशे रुपयांवर पोहोचले. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचा पैसा हडप करून विमा कंपन्यांचे घर भरल्याने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघात काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन रियाज अन्सारी यांनी केले. सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.राहुल गांधींच्या सभेला रणजित कांबळेंची दांडीवर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी व वर्धा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आर्वी येथे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात होत असलेल्या या राष्ट्रीय नेत्याच्या सभेला देवळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित कांबळे यांनी दांडी मारली. या त्यांच्या अनुपस्थितीती चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. रणजित कांबळे राष्ट्रीय नेत्याच्या सभेला गैरहजर राहिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांच्या भगिनी अ‍ॅड. चारूलता राव टोकस या राहुल गांधी यांच्या सभेला आवर्जून उपस्थित होत्या.

टॅग्स :wardha-acवर्धाRahul Gandhiराहुल गांधी