शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्य सैनिकही रिंगणात : अर्धेअधिक उमेदवार व्यावसायिक व शेतकरी, नोकरदार; गृहिणींची पाठ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारे येतात आणि जातात; परंतु शेतकऱ्यांच्या समस्या काही केल्या सुटता सुटत नाहीत. त्यामुळे शेतीशी नाळ जुळलेला आणि शेती व्यवसायाची माहिती असलेलाच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, असे मतदारांकडून बोलले जाते. पण, शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी व्यावसायिक आणि शेती असलेल्या परंपरागत उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याने नोकरदार व गृहिणींनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही फारसा उत्साह दाखविला नसल्याचे चित्र आहे.वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी असे चार विधानसभा मतदारसंघ असून या चारही मतदारसंघातूून ४७ उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रावरून त्यांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध झाला आहे. त्यानुसार निवडणूक रिंगणात असलेल्या ४७ उमेदवारांपैकी ३१.९१ टक्के उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचे साधन व्यवसाय व ३१.९१ टक्के उमेदवारांनी शेती दाखविले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेती आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांचे प्रमाण समान असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच वकील, पेन्शनर व नोकरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ६.३८ इतकी दर्शविली आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि मजुरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ४.२५ इतकी असून २.१२ टक्के उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. विशेषत: देवळी विधानसभा मतदारसंघातील एक स्वातंत्र्य सैनिकही या निवडणूक रिंगणात उभा ठाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणसंग्रामात काही प्रमाणात का होईना पण, सर्वसमावेशक उमेदवार आपले भविष्य अजमावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.विधानसभा मतदारसंघानिहाय उमेदवारांचे ‘प्रोफाईल’वर्धा मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचा व्यवसाय आहे. पाच उमेदवार शेतकरी असून एक उमेदवार हे वकील आहेत.

आर्वी मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार व्यवसाय करतात. तसेच तीन उमेदवार शेतकरी असून प्रत्येकी एक जण नोकरी, वकील, सेवानिवृत्त कर्मचारी व मजूर आहे.हिंगणघाट मतदारसंघया मतदारसंघातील तेरा उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. शेती करणाºया उमेदवारांची संख्या पाच असून नोकरी करणारे दोन व प्रत्येकी एक जण स्वयंरोजगार, मजुरी व काहीच न करणारे आहे.

देवळी मतदारसंघया मतदारसंघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सहा उमेदवार व्यवसाय करणारे आहेत. तीन उमेदवार शेतकरी आहेत. तर प्रत्येक एक उमेदवार शिक्षक, पेन्शनर, वकील, माजी सैनिक व स्वयंरोजगार असलेले आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा