शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्य सैनिकही रिंगणात : अर्धेअधिक उमेदवार व्यावसायिक व शेतकरी, नोकरदार; गृहिणींची पाठ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारे येतात आणि जातात; परंतु शेतकऱ्यांच्या समस्या काही केल्या सुटता सुटत नाहीत. त्यामुळे शेतीशी नाळ जुळलेला आणि शेती व्यवसायाची माहिती असलेलाच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, असे मतदारांकडून बोलले जाते. पण, शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी व्यावसायिक आणि शेती असलेल्या परंपरागत उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याने नोकरदार व गृहिणींनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही फारसा उत्साह दाखविला नसल्याचे चित्र आहे.वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी असे चार विधानसभा मतदारसंघ असून या चारही मतदारसंघातूून ४७ उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रावरून त्यांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध झाला आहे. त्यानुसार निवडणूक रिंगणात असलेल्या ४७ उमेदवारांपैकी ३१.९१ टक्के उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचे साधन व्यवसाय व ३१.९१ टक्के उमेदवारांनी शेती दाखविले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेती आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांचे प्रमाण समान असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच वकील, पेन्शनर व नोकरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ६.३८ इतकी दर्शविली आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि मजुरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ४.२५ इतकी असून २.१२ टक्के उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. विशेषत: देवळी विधानसभा मतदारसंघातील एक स्वातंत्र्य सैनिकही या निवडणूक रिंगणात उभा ठाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणसंग्रामात काही प्रमाणात का होईना पण, सर्वसमावेशक उमेदवार आपले भविष्य अजमावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.विधानसभा मतदारसंघानिहाय उमेदवारांचे ‘प्रोफाईल’वर्धा मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचा व्यवसाय आहे. पाच उमेदवार शेतकरी असून एक उमेदवार हे वकील आहेत.

आर्वी मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार व्यवसाय करतात. तसेच तीन उमेदवार शेतकरी असून प्रत्येकी एक जण नोकरी, वकील, सेवानिवृत्त कर्मचारी व मजूर आहे.हिंगणघाट मतदारसंघया मतदारसंघातील तेरा उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. शेती करणाºया उमेदवारांची संख्या पाच असून नोकरी करणारे दोन व प्रत्येकी एक जण स्वयंरोजगार, मजुरी व काहीच न करणारे आहे.

देवळी मतदारसंघया मतदारसंघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सहा उमेदवार व्यवसाय करणारे आहेत. तीन उमेदवार शेतकरी आहेत. तर प्रत्येक एक उमेदवार शिक्षक, पेन्शनर, वकील, माजी सैनिक व स्वयंरोजगार असलेले आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा