शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.

ठळक मुद्देनाराजांची संख्या वाढतीवरच : विकासाचा मुद्दा पडला मागे, देवळीत कॉँग्रेस उमेदवाराचा राष्टÑवादीचे साथ सोडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात यावेळी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तीन मतदारसंघात कॉँग्रेस आघाडी व भाजप-सेना युतीत थेट लढत असल्याचे दिसून येत आहे. थेट लढतीमध्ये प्रस्थापित लोकप्रतिनिधींचा मोठा कस प्रचारादरम्यान लागत आहे. तसेच गेल्यावेळी रिंगणात असलेले अनेक उमेदवार बाहेर असल्याने त्यांचीही भूमिका या निवडणुकीत अंत्यत महत्त्वाची ठरणार आहे.आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अमर शरद काळे यांचा सामना भाजप-सेना युतीचे उमेदवार दादाराव केचे यांच्यासोबत आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन ते तीन हजार मतांच्या अंतराने या मतदारसंघाचा निकाल फिरत राहिला आहे. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघात कसदार लढाई होणार आहे. दादाराव केचे यांनी मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघात मंगळवारी कॉँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र आणखी स्पष्ट होईल. या मतदारसंघात विद्यमान आमदारांसमोर अ‍ॅन्टी इन्कबन्सीचा प्रश्न प्रभावीपणे उभा आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक आधारावर या मतदार संघात प्रचाराने जोर पकडला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस व बंडखोराने अनेक भागात जोरदार धडाका लावल्याने भाजपसमोर अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. येथे राष्ट्रवादीला कॉँग्रेसची समर्थ साथ असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भाजपला सेनेची साथ असल्याचे कुठेही दिसत नाही. सेनेने बंडखोरांवर अजूनही कारवाई केली नसल्याने सेनेचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी जोरदार कामाला लागले आहेत.वर्धा मतदारसंघात विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणारे विद्यमान आमदार पंकज भोयर यांची प्रचार यंत्रणा गावागावांत कामाला लागली आहे. मात्र, या मतदारसंघात त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे तुल्यबळ आव्हान आहे. कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.देवळी मतदारसंघात कॉँग्रेसच्या विद्यमान लोकप्रतिनिधीविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या या लोकप्रतिनिधीचे एकही ठोस काम त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांसमोर मांडलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.भाजपचे खा. रामदास तडस यांच्यासह माजी खा. सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, ज्येष्ठ नेते प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी तसेच सेनेचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कॉँग्रेस पक्षातून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व नेते शिवसेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे कॉँग्रेसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या मतदारसंघात अपक्ष म्हणून राजेश बकाणे यांनीही जोरदार प्रचार चालविला आहे. येथे बहुजन समाज पक्षासह वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार निर्णायक राहणार आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा