शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

कला पथकाच्या माध्यमातून मतदारांना रिझविण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विकासासाठी डॉ. पंकज भोयर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. मागील पाच वर्षांत वर्धा मतदारसंघात विकासगंगा अवतरली आहे. त्यांनी शहरासह ग्रामीण भागालाही विकासाकरिता समान न्याय दिला असल्याचे सांगून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देचार मतदारसंघांत प्रचारतोफा थंडावल्या । प्रमुखपक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी रॅली व पदयात्रेतून केले मतदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी रॅली व पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, संपूर्ण प्रचारादरम्यान चार मतदारसंघांत प्रचार शांततेत पार पडला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन केले.वर्धा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी शास्त्री चौक ते शिवाजी चौक या दरम्यान रॅली काढून शक्तीप्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. त्यांच्या रॅलीत उमेदवार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, रविकांत बालपांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकूर, सुनीता ढवळे, शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, भाजपाचे महामंत्री सुनील गफाट, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे आदी उपस्थित होते.यावेळी कला पथकाच्या माध्यमातून मतदारांना रिझविण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विकासासाठी डॉ. पंकज भोयर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. मागील पाच वर्षांत वर्धा मतदारसंघात विकासगंगा अवतरली आहे. त्यांनी शहरासह ग्रामीण भागालाही विकासाकरिता समान न्याय दिला असल्याचे सांगून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले. या सभेला शिवसेनेचे जिल्हा संघटक रविकांत बालपांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सभेत वर्धा नगरपालिकेचे नगरसेवक, सेलू नगरपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वर्धा व सेलू तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.अखेरच्या दिवशी हिंगणघाट मतदारसंघात समुद्रपूर येथे भाजपचे उमेदवार समीर कुणावार यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. तर राकाँ उमेदवार राजू तिमांडे यांनी हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे) शहरात रॅली काढली. आर्वी मतदारसंघात आष्टी (शहीद) येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांनी सभा घेतली. काँग्रेस पक्षाच्यावतीनेही रॅलीच्या माध्यमातून आर्वी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. वर्धा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी सेलू येथे रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. याशिवाय शहरात अपक्ष उमेदवारांनीही रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. देवळी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारासह अपक्ष उमेदवार दिलीप अग्रवाल यांनीही मतदार संघातील विविध भागात रॅली व पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. देवळी येथे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश बकाने यांनी शक्ती प्रदर्शन केले. सर्व पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांच्या रॅली ठिकठिकानाहून निघाल्याने त्यांच्या शिस्तबद्धता दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीदरम्यान काही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

टॅग्स :wardha-acवर्धा