शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

‘एम किसान’ महिन्यापासून बंद

By admin | Updated: September 12, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली.

रूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली. ती काही दिवस सुखरूप सुरू राहिली; मात्र गत महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकही एसएमएस गेला नाही. या यंत्रणेमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येत असल्यामुळे ही योजना थेट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या शेतात पीकं बहरली आहेत. अशात निसर्गाचा लहरीपणा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आड येत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा हल्ला होत आहे. याची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता असलेली ही ‘एम किसान’ योजना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नव्या रोगांची व पिकांवर आलेल्या सध्याच्या किडवर कसे नियंत्रण मिळवावे याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता या एम किसानची गरज भासत आहे. ऐन गरजेच्यावेळी शासनाची ही यंत्रणा शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत आहे. ही योजना केवळ एका वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविताना शासनावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड येत असल्याने ही योजना सध्या बंद असल्याचे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून कळविले असल्याचे वर्धा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. या योजनेकरिता आणखी किती निधी लागणार यावर होणाऱ्या चर्चेअंती ही योजना राबवावयाची अथवा नाही यावर निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेला ‘एम किसान’ येत्या काळात सुरू राहील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.