शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘एम किसान’ महिन्यापासून बंद

By admin | Updated: September 12, 2015 01:58 IST

शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली.

रूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली. ती काही दिवस सुखरूप सुरू राहिली; मात्र गत महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकही एसएमएस गेला नाही. या यंत्रणेमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येत असल्यामुळे ही योजना थेट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या शेतात पीकं बहरली आहेत. अशात निसर्गाचा लहरीपणा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आड येत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा हल्ला होत आहे. याची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता असलेली ही ‘एम किसान’ योजना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नव्या रोगांची व पिकांवर आलेल्या सध्याच्या किडवर कसे नियंत्रण मिळवावे याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता या एम किसानची गरज भासत आहे. ऐन गरजेच्यावेळी शासनाची ही यंत्रणा शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत आहे. ही योजना केवळ एका वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविताना शासनावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड येत असल्याने ही योजना सध्या बंद असल्याचे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून कळविले असल्याचे वर्धा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. या योजनेकरिता आणखी किती निधी लागणार यावर होणाऱ्या चर्चेअंती ही योजना राबवावयाची अथवा नाही यावर निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेला ‘एम किसान’ येत्या काळात सुरू राहील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.