शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:57 IST

यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१४.८९ लाख खड्डे खोदले : ग्रीन आर्मीसह सामाजिक संघटनांचे घेणार सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असून सदर उद्दीष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने सध्या कंबर कसल्याचे दिसते. आतापर्यंत जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १४.८९ लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये १ ते ३१ जुलै या कालावधीत रोपटे लावण्यात येणार आहेत.गत दोन वर्षांपासून हरित महाराष्ट्र या हेतूने पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यात येते आहे. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या स्वयंसेवकांसह काही सामाजिक संघटनांचेही सहकार्य घेतल्या जात आहे. यंदा सदर उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या वन विभागासह जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. १ जुलै ते ३१ जुलै या नियोजित वेळेत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षरोपण व्हावे यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात १४ लाख ८९ हजार ६२९ खड्डे खोदण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे कसे झटपट खोदता येतील यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.११.१० लाख खड्डे खोदण्याचे काम युद्धपातळीवरहरित वर्धा पर्यायाने हरित महाराष्ट्र या हेतूने १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४ लाख ८९ हजार ६२९ खड्डे खोदण्यात आले असून उर्वरित ११ लाख १० हजार ३७१ खड्डे खोदण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात वन विभागाने आघाडी घेतली आहे.जनजागृतीपर दिंडीचे होणार आगमणवृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देणारी वृक्ष दिंडी आ. अनिल सोले यांच्या नेतृत्त्वात गोंदीया जिल्ह्यातील चिचगड येथून काढण्यात येणार आहे. ही वृक्ष दिंडी व त्या दिडीत सहभागी चित्ररथ २ जुलैला वर्धेत दाखल होणार आहे. सदर वृक्ष दिंडीचा समारोप नागपूर येथे होणार असल्याचे सांगण्यात आले.दोन विभागांना उपलब्ध करून दिली जागाहरित वर्धा या उद्देशाने वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने त्यांच्या मालकीची जागा ग्रामीण पाणी पुरवठा आणि पाटबंधारे विभागाला उपलब्ध करून दिली आहे. पाटबंधारे विभागाला वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथे २० हेक्टर तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कारंजा तालुक्यात १५ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणांवर पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.५० ठिकाण हिरवे करण्याचा मानसजिल्ह्यातील ५० ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून सदर परिसर हरितमय करण्याचा मानस यंदा जिल्हा प्रशासनाचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. आतापर्यंत त्यासाठी आजनसरा येथील आॅक्सीजन पार्कसह सुमारे चार ठिकाण निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मागेल त्याला मिळणार रोपटेवृक्ष लागवड या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ हा उद्देश यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील वनविभाग उराशी बाळगून आहे. मागणी करणाऱ्या प्रत्येकाला अल्प मोबदल्यात वन विभाग वृक्षारोपणासाठी विविध प्रजातींची रोपटे उपलब्ध करून देणार आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग