शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करा

By admin | Updated: April 21, 2016 02:30 IST

‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण ....

माथा ते पायथा जलशिवार योजना : पाच गावातील गावकऱ्यांची शासनाकडे मागणीकारंजा : ‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे. खोलीकरण झाल्यास ड्रायझोनमध्ये असलेल्या ठाणेगाव, चंदेवाणी, मदनी, सेलगाव, बिहाडी या पाच गावातील दुष्काळ मिटू शकतो. त्यामुळे माथा ते पायथा योजनेंतर्गत सदर गाव करावे अशी मागणी राज्य शासनाकडे या पाचही गावातील नागरिकांनी ठरावानिशी केली आहे.कारंजा तालुक्यातील चंदेवाणी, मदनी, ठाणेगाव, सेलगाव (लवणे), बिहाडी ही गावे ड्रायझोनमध्ये असून येथे कायमस्वरूपी दुष्काळ असतो. पिण्याच्या पाण्यासोबतच गुराढोरांना चारा व पाणी हा प्रश्नही या गावांला तिव्रतेने जाणवतो. ही गावे उंचावर असल्यामुळे खैरी धरणाचे पाणी या गावांना मिळू शकत नाही. त्यामुळे या गावांचा विकास खोळंबला आहे. येथील पाणीपातळी खूप खोल गेली आहे. खडकाळ भूभाग असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही.हेटीकुंडी तलावापासून कार (खैरी) प्रकल्पापर्यंत अंदाजे नऊ कि़मी. परिसरात अंबा नदी वाहते. अर्ध्या हिवाळ्यापर्यंत या नदीला पाणी असते. पण नदीची रूंदी व खोली कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी बाजूच्या शेतात पसरून शेतीचे व पिकांचे नुकसान होत.‘माथा ते पायथा जलशिवार योजनेंतर्गत’ या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास तसेच नदीपात्रात बॅरेजेस, लहान तलाव व बंधारे निर्माण केल्यास पाण्याची साठवणूक होवून पाचही गावांची पाणीसमस्या कायमस्वरूपी दूर होवू शकते.तसेच या नदीतून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर कोल्हापुरी बंधारे आणि उंच पूल बांधल्यास पाण्याचा साठा वाढून सभोवतालच्या विहिरींच्या पाण्याची पातळीहई वाढू शकते. त्यामुळे जून २०१६ पूर्वी हे काम शासनामार्फत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाला जवळपास ६ ते ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण योजना राबविल्यास या पाच गावातील जलसमस्या कायमची संपेल, असे तज्ज्ञ जानकारांचे मत आहे.योजनेचे महत्व व उपयोगीता लक्षात घेवून सेलगावचे सरपंच हनुमंत पठाडे, बिहाडीचे सरपंच कोकाटे, चंदेवाणीचे उपसरपंच अजय इंगळे, मदनीचे प्रदीप शेटे, बिहाडीचे विनोद धांदे, ठाणेगावचे सरपंच बोरकर, उपसरपंच साहेबराव पांडे, चंदेवाणीचे सरपंच कांबळे यांनी ग्रा.पं. स्तरावर ठराव घेवून लेखी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)