शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करा

By admin | Updated: April 21, 2016 02:30 IST

‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण ....

माथा ते पायथा जलशिवार योजना : पाच गावातील गावकऱ्यांची शासनाकडे मागणीकारंजा : ‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे. खोलीकरण झाल्यास ड्रायझोनमध्ये असलेल्या ठाणेगाव, चंदेवाणी, मदनी, सेलगाव, बिहाडी या पाच गावातील दुष्काळ मिटू शकतो. त्यामुळे माथा ते पायथा योजनेंतर्गत सदर गाव करावे अशी मागणी राज्य शासनाकडे या पाचही गावातील नागरिकांनी ठरावानिशी केली आहे.कारंजा तालुक्यातील चंदेवाणी, मदनी, ठाणेगाव, सेलगाव (लवणे), बिहाडी ही गावे ड्रायझोनमध्ये असून येथे कायमस्वरूपी दुष्काळ असतो. पिण्याच्या पाण्यासोबतच गुराढोरांना चारा व पाणी हा प्रश्नही या गावांला तिव्रतेने जाणवतो. ही गावे उंचावर असल्यामुळे खैरी धरणाचे पाणी या गावांना मिळू शकत नाही. त्यामुळे या गावांचा विकास खोळंबला आहे. येथील पाणीपातळी खूप खोल गेली आहे. खडकाळ भूभाग असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही.हेटीकुंडी तलावापासून कार (खैरी) प्रकल्पापर्यंत अंदाजे नऊ कि़मी. परिसरात अंबा नदी वाहते. अर्ध्या हिवाळ्यापर्यंत या नदीला पाणी असते. पण नदीची रूंदी व खोली कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी बाजूच्या शेतात पसरून शेतीचे व पिकांचे नुकसान होत.‘माथा ते पायथा जलशिवार योजनेंतर्गत’ या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास तसेच नदीपात्रात बॅरेजेस, लहान तलाव व बंधारे निर्माण केल्यास पाण्याची साठवणूक होवून पाचही गावांची पाणीसमस्या कायमस्वरूपी दूर होवू शकते.तसेच या नदीतून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर कोल्हापुरी बंधारे आणि उंच पूल बांधल्यास पाण्याचा साठा वाढून सभोवतालच्या विहिरींच्या पाण्याची पातळीहई वाढू शकते. त्यामुळे जून २०१६ पूर्वी हे काम शासनामार्फत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाला जवळपास ६ ते ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण योजना राबविल्यास या पाच गावातील जलसमस्या कायमची संपेल, असे तज्ज्ञ जानकारांचे मत आहे.योजनेचे महत्व व उपयोगीता लक्षात घेवून सेलगावचे सरपंच हनुमंत पठाडे, बिहाडीचे सरपंच कोकाटे, चंदेवाणीचे उपसरपंच अजय इंगळे, मदनीचे प्रदीप शेटे, बिहाडीचे विनोद धांदे, ठाणेगावचे सरपंच बोरकर, उपसरपंच साहेबराव पांडे, चंदेवाणीचे सरपंच कांबळे यांनी ग्रा.पं. स्तरावर ठराव घेवून लेखी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)