शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले.

ठळक मुद्देबारावीचा निकालाचा टक्का वाढला : जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ विद्यालयाचा विद्यार्थी प्रणय विलासराव शिरपुरे हा वाणिज्य शाखेतून तर हिंगणघाटच्याच जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू आशिषसिंह चव्हाण हा विज्ञान शाखेतून पहिला आला. दोन्ही विद्यार्थी हिंगणघाटमधील असल्याने गुणवंतांनी शहराचा बोलबाला कायम ठेवला.जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले. त्याला सर्वाधिक गुण असल्याने तो जिल्ह्यातून आणि वाणिज्य शाखेतूनही प्रथम आला. तर जीएस कॉमर्स कॉलेज वर्धा येथील योगेश सुनील कोटरांगे याला ९५.२३ आणि सिद्धी किशोर उमाटे हिला ९४.७७ टक्के गुण मिळाल्याने ते अनुक्रमे द्वितीय व तृतीय आलेत. हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयातील हिमांशू चव्हाण याने ९६.७६ टक्के गुण प्राप्त करुन विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच बजाज ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स (जे.बी.सायंन्स) ची तनया नीलेश भांजळे हिने ९५.०१ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हिंगणघाटच्या जी. बी. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाची महक संजय गौतम आणि मानसी राजेशकुमार मानधनिया या दोघींनाही ९४.७६ टक्के गुण मिळाले असून दोघीही विज्ञान शाखेतून तृतीय आल्या आहे.गुणवत्तेत मुलीच ठरल्या ‘भारी’जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून ८ हजार ५८१ मुले व ८ हजार १२१ मुलींनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ८ हजार ५०० मुले व ८ हजार ७६ मुली अशा एकूण १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ हजार ८२ मुले व ७ हजार ४०५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावरुन उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ८३.३२ तर मुलींची टक्केवारी ९१.६९ असल्याने मुलींनीच यावर्षी गुणवत्तेत भारी असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल