शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले.

ठळक मुद्देबारावीचा निकालाचा टक्का वाढला : जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ विद्यालयाचा विद्यार्थी प्रणय विलासराव शिरपुरे हा वाणिज्य शाखेतून तर हिंगणघाटच्याच जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू आशिषसिंह चव्हाण हा विज्ञान शाखेतून पहिला आला. दोन्ही विद्यार्थी हिंगणघाटमधील असल्याने गुणवंतांनी शहराचा बोलबाला कायम ठेवला.जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले. त्याला सर्वाधिक गुण असल्याने तो जिल्ह्यातून आणि वाणिज्य शाखेतूनही प्रथम आला. तर जीएस कॉमर्स कॉलेज वर्धा येथील योगेश सुनील कोटरांगे याला ९५.२३ आणि सिद्धी किशोर उमाटे हिला ९४.७७ टक्के गुण मिळाल्याने ते अनुक्रमे द्वितीय व तृतीय आलेत. हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयातील हिमांशू चव्हाण याने ९६.७६ टक्के गुण प्राप्त करुन विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच बजाज ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स (जे.बी.सायंन्स) ची तनया नीलेश भांजळे हिने ९५.०१ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हिंगणघाटच्या जी. बी. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाची महक संजय गौतम आणि मानसी राजेशकुमार मानधनिया या दोघींनाही ९४.७६ टक्के गुण मिळाले असून दोघीही विज्ञान शाखेतून तृतीय आल्या आहे.गुणवत्तेत मुलीच ठरल्या ‘भारी’जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून ८ हजार ५८१ मुले व ८ हजार १२१ मुलींनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ८ हजार ५०० मुले व ८ हजार ७६ मुली अशा एकूण १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ हजार ८२ मुले व ७ हजार ४०५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावरुन उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ८३.३२ तर मुलींची टक्केवारी ९१.६९ असल्याने मुलींनीच यावर्षी गुणवत्तेत भारी असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल