शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले.

ठळक मुद्देबारावीचा निकालाचा टक्का वाढला : जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ विद्यालयाचा विद्यार्थी प्रणय विलासराव शिरपुरे हा वाणिज्य शाखेतून तर हिंगणघाटच्याच जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू आशिषसिंह चव्हाण हा विज्ञान शाखेतून पहिला आला. दोन्ही विद्यार्थी हिंगणघाटमधील असल्याने गुणवंतांनी शहराचा बोलबाला कायम ठेवला.जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले. त्याला सर्वाधिक गुण असल्याने तो जिल्ह्यातून आणि वाणिज्य शाखेतूनही प्रथम आला. तर जीएस कॉमर्स कॉलेज वर्धा येथील योगेश सुनील कोटरांगे याला ९५.२३ आणि सिद्धी किशोर उमाटे हिला ९४.७७ टक्के गुण मिळाल्याने ते अनुक्रमे द्वितीय व तृतीय आलेत. हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयातील हिमांशू चव्हाण याने ९६.७६ टक्के गुण प्राप्त करुन विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच बजाज ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स (जे.बी.सायंन्स) ची तनया नीलेश भांजळे हिने ९५.०१ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हिंगणघाटच्या जी. बी. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाची महक संजय गौतम आणि मानसी राजेशकुमार मानधनिया या दोघींनाही ९४.७६ टक्के गुण मिळाले असून दोघीही विज्ञान शाखेतून तृतीय आल्या आहे.गुणवत्तेत मुलीच ठरल्या ‘भारी’जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून ८ हजार ५८१ मुले व ८ हजार १२१ मुलींनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ८ हजार ५०० मुले व ८ हजार ७६ मुली अशा एकूण १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ हजार ८२ मुले व ७ हजार ४०५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावरुन उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ८३.३२ तर मुलींची टक्केवारी ९१.६९ असल्याने मुलींनीच यावर्षी गुणवत्तेत भारी असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल