शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जलद बस थांब्याविना विद्यार्थ्यांचे नुकसान

By admin | Updated: October 6, 2014 23:18 IST

नजीकच्या पवनार येथून दररोज शेकडो विद्यार्थी वर्ध्याला शिक्षणासाठी ये जा करतात. सुपर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना आॅर्डिनरी बसची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. परिणामी बरेचदा त्यांना शाळेत

वर्धा : नजीकच्या पवनार येथून दररोज शेकडो विद्यार्थी वर्ध्याला शिक्षणासाठी ये जा करतात. सुपर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना आॅर्डिनरी बसची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. परिणामी बरेचदा त्यांना शाळेत पोहोचायला उशीर होत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वारंवार पवनारला सुपर बसचा थांबा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. पवनार हे वर्धा नागपूर महामार्गावरील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १० ते १२ हजाराच्या आसपास आहे. येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी वर्धा आणि सेलूला जात असतात. यासाठी राज्य शासनाद्वारे बसपासची सुविधा देण्यात आल्याने विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी बसचा उपयोग करतात. या मार्गावर सुपर बसेसची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सुपर बसचा थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना आॅर्डिनरी बसेसचाच वापर करावा लागतो. त्या बसेस तुलनेने कमी असल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्याची वेळे ही सकाळी सात च्या सुमारास तसेच दुपारी ११ ते १२ या दरम्यान आहे. त्यामुळे या वेळात विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त असते. पण या वेळेत तुलनेने बस कमी असल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ होते. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना चढता येत नाही. त्यामुळे पुढच्या बसची वाट पहात त्यांना ताटकळत राहावे लागते किंवा अधिकचे पैसे देऊन आॅटोने वर्धा किंवा सेलूला जावे लागते. या कारणाने आर्थिक नुकसान होते. आॅटोची तिकीट जास्त असल्याने गावातील इतरही नागरिक बसने जाण्याला प्राधान्य देतात. या कारणाने बसमध्ये आणखी गर्दी होत असते. बरेचदा आॅटोचालक बस येत असतानाच नेमके बसस्थानकावर आॅटो उभे करतात. त्यामुळे बस पकडताना धावाधाव होत असते.तसेच विद्यार्थिनींची या गर्दीत चढताना जास्त कुचंबना होते. त्यामुळे येथे सुपर बसचा थांबा देण्याची मागणी वारंवार विद्यार्थी व पालकांद्वारे केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)