शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे नुकसान, मळणी यंत्राची घरघर थांबली

By admin | Updated: March 14, 2015 02:01 IST

बुधवारी रात्री विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गहू, चन्याचे नुकसान झाले. यामुळे हार्वेस्टर आणि हडींबा या मळणी यंत्राची घरघरही थांबल्याचे चित्र आहे़

सेवाग्राम : बुधवारी रात्री विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गहू, चन्याचे नुकसान झाले. यामुळे हार्वेस्टर आणि हडींबा या मळणी यंत्राची घरघरही थांबल्याचे चित्र आहे़ खरिपाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिकांवर आशा असताना नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या मागेच लागली़ हातात आलेला गहू व चना आता धोक्यात आला आहे. शेतात वाळलेला गहू व चना आहे. मळणी यंत्राचे एकाच वेळी काम आल्याने शेतकरी यंत्राच्या प्रतीक्षेत दिसून येतात़ सेवाग्राम, हमदापूर परिसरात हार्वेस्टर दाखल झाले आहेत़ गहू काढण्याच्या कामालाही वेग आला होता; पण बुधवारी आलेल्या पावसाने हार्वेस्टरला विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे दिसते़ चना सवंगून झाकून ठेवण्यात आलेला असून संकटे पाठपुरावा करीत असल्याचे दिसते़उदरनिर्वाहाचे साधन शेती व शेती उत्पादने असल्याने पिके हातची जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करणारा शेतकरी मात्र बाजार भावाने हतबल झाल्याचे दिसून येत आहे़ सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेती कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे़(वार्ताहर)