शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे शेत वाचविण्यासाठी अन्य शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: June 11, 2017 00:49 IST

तालुक्यातील वायगाव नजीकच्या सरूळ टाकळी शिवारात कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना कंत्राटदार स्वत:च्या फायद्यासाठी

कंत्राटदाराचा प्रताप : शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यातील वायगाव नजीकच्या सरूळ टाकळी शिवारात कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना कंत्राटदार स्वत:च्या फायद्यासाठी इतर शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचे दिसते. स्वत: मोबदला घेतला असताना इतरांच्या शेतातून खोदकाम केले जात आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून कार्यवाहीची मागणी केली आहे. सरुळ-टाकळी शिवेवरील कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालव्यासाठी रंजीत इंगोले नामक शेतकऱ्याची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यापोटील लाखो रुपयांचा मोबदलाही त्यांना शासनाकडून देण्यात आला आहे. शिवाय त्याच शेतकऱ्याने कालव्याचे कंत्राटही घेतले आहे. परिणामी, कालव्याचे काम करीत असताना मोबदला घेतला असताना स्वत:चे शेत वाचविण्याचा प्रयत्न सदर कंत्राटदार करीत आहे. चार महिन्यांपूर्वी वाल्मिक गावंडे व दीपक गावंडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मोजणी करून घेतली असता ही बाब उघड झाली. अधिग्रहित केलेली जमीन सोडून कंत्राटदार आपल्याच शेतातून कालव्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे त्यांनी कंत्राटदाराला काम करण्यास मज्जाव केला. शेतकरी शेतात कालव्याचे काम करू देणार नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने रात्री कामाचा सपाटा लावला आहे. जेसीबीच्या साह्याने रात्री कालव्यासाठी खोदकाम केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या अन्यायाविरूद्ध शेतकऱ्यांनी देवळीच्या तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. यात अधिग्रहित जमिनीवर कालव्याचे खोदकाम न करता कंत्राटदार समोरील शेतकऱ्याच्या शेतात खोदकाम करून १५ ते २० फुटाचे नुकसान करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोका चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी दिनेश सरोदे, सुभाष कांबळे, अनिल कांबळे, सिद्धार्थ कांबळे, वाल्मीक गावंडे, दीपक गावंडे, सतीश गावंडे, अशोक गावंडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. स्वत:ची शेती कालव्यात जात असताना आणि शासनाकडून मिळालेला मोबदलाही लाटला असताना ते शेत वाचविण्याच्या प्रयत्नात कंत्राटदार इतरांना गंडवित असून हा प्रकार अन्यायकारक ठरत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. लाभार्थ्यालाच दिले कालव्याचे कंत्राट यशोदा नदीच्या या कालव्यामध्ये सरूळ टाकळी येथील रंजीत इंगोले यांचे शेत गेले आहे. याबाबत त्यांना शासनाकडून मोबदलाही देण्यात आलेला आहे. यामुळे ते लाभार्थी ठरत आहे. वास्तविक, त्यांना वगळून इतर कंत्राटदारास कालव्याचे काम देता आले असते; पण त्याच शेतकऱ्याला कालव्याचे काम देण्यात आले आहे. यामुळे सदर शेतकरी तथा कंत्राटदार आपली शेतजमीन शाबूत ठेवत इतरांच्या शेतातून कालव्याची निर्मिती करीत असल्याचे दिसून येते. लाभार्थीच ठेकेदार झाल्याने हा प्रकार घडत आहे. दिवसा शेतकरी विरोध करतील म्हणून रात्री कामे केली जात आहेत. संबंधित अधिकाऱ्याचेही त्याला पाठबळ असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. आमची शेती गेली नसून काम करण्यापूर्वी साधे नोटीस देणे अनिवार्य होते. मात्र कुठलीही माहिती न देता रात्री काम करीत होते. ठेकेदार रंजित इंगोले स्वत:ची शेती वाचवण्यासाठी आमचे नुकसान करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करुन आम्हाला न्याय द्यावा. - दिनेश सरोदे, नुकसानग्रस्त शेतकरी, सरुळ.