शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

स्वत:चे शेत वाचविण्यासाठी अन्य शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: June 11, 2017 00:49 IST

तालुक्यातील वायगाव नजीकच्या सरूळ टाकळी शिवारात कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना कंत्राटदार स्वत:च्या फायद्यासाठी

कंत्राटदाराचा प्रताप : शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यातील वायगाव नजीकच्या सरूळ टाकळी शिवारात कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना कंत्राटदार स्वत:च्या फायद्यासाठी इतर शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचे दिसते. स्वत: मोबदला घेतला असताना इतरांच्या शेतातून खोदकाम केले जात आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून कार्यवाहीची मागणी केली आहे. सरुळ-टाकळी शिवेवरील कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालव्यासाठी रंजीत इंगोले नामक शेतकऱ्याची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यापोटील लाखो रुपयांचा मोबदलाही त्यांना शासनाकडून देण्यात आला आहे. शिवाय त्याच शेतकऱ्याने कालव्याचे कंत्राटही घेतले आहे. परिणामी, कालव्याचे काम करीत असताना मोबदला घेतला असताना स्वत:चे शेत वाचविण्याचा प्रयत्न सदर कंत्राटदार करीत आहे. चार महिन्यांपूर्वी वाल्मिक गावंडे व दीपक गावंडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मोजणी करून घेतली असता ही बाब उघड झाली. अधिग्रहित केलेली जमीन सोडून कंत्राटदार आपल्याच शेतातून कालव्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे त्यांनी कंत्राटदाराला काम करण्यास मज्जाव केला. शेतकरी शेतात कालव्याचे काम करू देणार नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने रात्री कामाचा सपाटा लावला आहे. जेसीबीच्या साह्याने रात्री कालव्यासाठी खोदकाम केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या अन्यायाविरूद्ध शेतकऱ्यांनी देवळीच्या तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. यात अधिग्रहित जमिनीवर कालव्याचे खोदकाम न करता कंत्राटदार समोरील शेतकऱ्याच्या शेतात खोदकाम करून १५ ते २० फुटाचे नुकसान करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोका चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी दिनेश सरोदे, सुभाष कांबळे, अनिल कांबळे, सिद्धार्थ कांबळे, वाल्मीक गावंडे, दीपक गावंडे, सतीश गावंडे, अशोक गावंडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. स्वत:ची शेती कालव्यात जात असताना आणि शासनाकडून मिळालेला मोबदलाही लाटला असताना ते शेत वाचविण्याच्या प्रयत्नात कंत्राटदार इतरांना गंडवित असून हा प्रकार अन्यायकारक ठरत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. लाभार्थ्यालाच दिले कालव्याचे कंत्राट यशोदा नदीच्या या कालव्यामध्ये सरूळ टाकळी येथील रंजीत इंगोले यांचे शेत गेले आहे. याबाबत त्यांना शासनाकडून मोबदलाही देण्यात आलेला आहे. यामुळे ते लाभार्थी ठरत आहे. वास्तविक, त्यांना वगळून इतर कंत्राटदारास कालव्याचे काम देता आले असते; पण त्याच शेतकऱ्याला कालव्याचे काम देण्यात आले आहे. यामुळे सदर शेतकरी तथा कंत्राटदार आपली शेतजमीन शाबूत ठेवत इतरांच्या शेतातून कालव्याची निर्मिती करीत असल्याचे दिसून येते. लाभार्थीच ठेकेदार झाल्याने हा प्रकार घडत आहे. दिवसा शेतकरी विरोध करतील म्हणून रात्री कामे केली जात आहेत. संबंधित अधिकाऱ्याचेही त्याला पाठबळ असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. आमची शेती गेली नसून काम करण्यापूर्वी साधे नोटीस देणे अनिवार्य होते. मात्र कुठलीही माहिती न देता रात्री काम करीत होते. ठेकेदार रंजित इंगोले स्वत:ची शेती वाचवण्यासाठी आमचे नुकसान करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करुन आम्हाला न्याय द्यावा. - दिनेश सरोदे, नुकसानग्रस्त शेतकरी, सरुळ.