शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कालवा पाझरल्याने शेताचे नुकसान

By admin | Updated: May 7, 2017 00:37 IST

पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे.

बांधकामाला तडा : झुडुपांचा विळखा तर कुठे अर्धवट कामांमुळे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे. याची झळ पिकांना बसत असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. तालुक्यातील पेठअहमदपूर, परसोडा, खडकी, गोदावरी या चार मौजामधील अवस्था बिकट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अप्पर वर्धा धरण विभाग व तालुक्यातील तलावांमधून पिकांसाठी पाणी सोडल्या जाते. पेठअहमदपुर कडून परसोडाकडे जाणाऱ्या कालव्याला जागोजागी तडा गेल्या आहे. अर्धवट बांधकाम झाल्यामुळे कालव्यातून वाहणारे पाणी थेट शेतात साचत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कालवे विभागाला अवगत केले तरी दुरुस्ती केली नाही. या पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या बाजुला गटारगंगा तयार झाली आहे. कालवा आणि शेत याला लागून असलेल्या रस्त्याची यामुळे दुरवस्था निर्माण झाली आहे. बांधकाम करण्यासाठी खोदून ठेवलेल्या कालव्याची अवस्था खराब झाली आहे. गाळ साचला, झाडे-झुडपे वाढली, दगड पडल्याने पाणी सोडण्याचे गेट बंद झाले, अ‍ॅप्रोच मधून पाणी पाझरत आहे. काळ्या मातीमुळे बांधलेला भागही दबत असल्याने कालव्याचे भविष्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शेतीला पाणी मिळावे याच हेतुने कालवे बांधण्यात आले. मात्र गत अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीला केराची टोपली मिळत आहे. आष्टी तलावाद्वारे बांधकाम झालेला कालवा देखील अर्धवट आहे. कालव्यात बाभळीची झाडे वाढली आहे. ती तत्काळ काढून साफसफाई करावी, लिकेज ठिकाणी दुरुस्ती करून शेतात पाणी पाझरणार नाही. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीच कालवे व पाटसऱ्या बांधण्यात आल्या. यातील दुरुस्ती व साफसफाई करण्याचे आदेश दिले असून पाणी सोडणारे व सफाई मजुर हे कामात दिरंगाई करीत असल्यास कारवाई करणार - पी.पी. पोटफोडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे धरण विभाग अमरावती