शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोने गहाण करताच केली जाते कर्ज कपात

By admin | Updated: August 18, 2016 00:40 IST

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पीककर्ज घेतले. पेरण्या उरकल्या. काही प्रमाणात निंदण, डवरणाची कामेही झाली;

बँकांचा प्रताप : शेतीच्या कामांमध्ये येतोय व्यत्यय सेलू : शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पीककर्ज घेतले. पेरण्या उरकल्या. काही प्रमाणात निंदण, डवरणाची कामेही झाली; पण आता खत देणे, फवारणी करणे यासह पुन्हा निंदणाची कामे करावी लागणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकरी सोने तारण करून कर्ज घेण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण बँकेत सोने तारण करताच मिळणाऱ्या रकमेतून पीक कर्जाची कपात केली जात असल्याचे प्रकार उघड होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी मात्र हतबल झाला असून शासनाचे शेतकरी हिताचे धोरण कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यामुळेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. कर्जाची रक्कम इतर रकमेतून कपात केली जाणार नसल्याचे शासनाने जाहीर केले. असे असले तरी कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेती गहाण करावी लागते. यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांनी जवळ असलेले सोने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेण्याचा पर्याय निवडला; पण हा मार्गही शेतकऱ्यांकरिता जटीलच ठरत आहे. बँक आॅफ इंडियाच्या सेलू शाखेमध्ये शेतकरी सुवर्ण तारण योजनेंतर्गत कर्ज घेण्याकरिता जात आहेत. बँकेतून सोने गहाण ठेवून मिळणारी रक्कम पूर्ण न देता शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जात वळते करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. शेतीला निंदण, डवरणी, खत व फवारणी देण्याची वेळ असताना अशी कर्जकपात होत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सावकाराच्या दारात लोटण्याचा प्रकार सुरू आहे. आता शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. काही शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बँकेतून रिकाम्या हाताने परतत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मग, शेतकऱ्यांनी जाब कुणाला विचारायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने बँकेतील या प्रकारांकडे लक्ष देत कार्यवाही करावी, सुवर्ण तारण योजनेत कर्जकपात करण्यात येऊ नये, अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.(शहर प्रतिनिधी) शेतकरी हिताच्या धोरणांचा अभाव शेतकरी हिताची धोरणे राबविली जातील, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते; पण अद्यापही शेतकरी हिताची धोरणे राबविली जात नसल्याचेच दिसून येत आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही बँकांकडून त्रास दिला जात असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना सुवर्ण तारण योजनेंतर्गत सोने गहाण ठेवून कर्ज दिले जात आहे. यात शेतकऱ्यांकडे जुने कर्ज असल्यास ते आपोआप कपात होत आहे. ही कपात अधिक होत नसून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. बँकेच्या सॉफ्टवेअरमुळेच हा प्रकार होत आहे. - दीपक पिंपरीकर, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, सेलू.