शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

चालानच्या नावावर ग्रामीण वाहनचालकांची लूट

By admin | Updated: November 15, 2015 01:33 IST

शहरी युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते.

वाहतूक पोलिसांची दहशत : दुचाकी घरी ठेवून आॅटोने प्रवासआकोली : शहरी युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते. अधिक रकमेच्या चालाणची भीती दाखवून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, आॅटो सोडून दुचाकी चालकांवरच अधिक कारवाई होताना दिसते. यामुळे ग्रामीण नागरिक दुचाकी घरी ठेवून आॅटोने भुर्दंड सोसत शहरात जात असल्याचे दिसते.वाहनांचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. दारासमोर बैलजोडी दिसणार नाही; पण दुचाकी हमखास दिसते, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी दुचाकी असल्याचे दिसते. वाहतूक सोईची व्हावी म्हणून वाहनांचा वापर वाढत असला तरी वाहन चालकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरी मोटारसायकल असताना आॅटोने प्रवास करताना दिसतात. शहरात कोणत्याही रस्त्याने गेले तरी वाहतूक पोलीस शिपाई ग्रामीण नागरिकांना अडवितात. या प्रकारामुळे अनेक युवक त्रस्त झाले आहेत. कागदपत्राची चौकशी करताना एखादा कागद नसला तरी त्याला १२०० रुपयांची चालाण फाडावी लागेल, असे सांगून २०० ते ५०० रुपये घेत सोडले जात असल्याचे ग्रामीण युवक सांगतात. दुसरीकडे शहरी युवक वाहतूक भरधाव जात असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. वाहतूक शाखेतील काहींमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत वाहतूक पोलिसांच्या कारवायांना आवर घालावा, अशी मागणी ग्रामीण वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)शेतमाल आणणाऱ्या वाहनांवरही कारवाईसध्या सोयाबीन, कापूस हा शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते; पण वाहतूक शाखेच्या दडपशाहीला वाहनचालक कंटाळले आहेत. दररोज शहरात जावे लागत असल्याने चालाण न घेता पैसे उकळले जात असल्याचे वाहन चालक सांगतात. गाडी ओव्हरलोड आहे, वजन करावे लागेल, अडीच हजारांची चालाण घे, अशा स्वरूपाच्या धमक्या देत अधिकाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून पैसे उकळण्याकरिता, असा संतप्त सवाल ग्रामीण युवक उपस्थित करीत आहेत. यापूर्वी वर्धा कृषभ उत्पन्न बाजार समिती प्रशासनानेही वाहतूक पोलिसांबाबत अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पॉर्इंट सोडून भलतीकडेच शिपाई फिरताना दिसतात, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.