शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वाहनतळाद्वारे सामान्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:21 IST

प्रशासकीय भवन परिसरातील वाहन व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अधिकारी, कर्मचाºयांना दिल्या. या सूचनांचा विपर्यास करीत महसूल कर्मचारी संघटनेने थेट वाहनतळाचे कंत्राटच दिले. आता प्रशासकीय भवनाच्या गेटमधून वाहन आत येताच पावती फाडावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय भवनातील प्रकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचा विपर्यास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासकीय भवन परिसरातील वाहन व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अधिकारी, कर्मचाºयांना दिल्या. या सूचनांचा विपर्यास करीत महसूल कर्मचारी संघटनेने थेट वाहनतळाचे कंत्राटच दिले. आता प्रशासकीय भवनाच्या गेटमधून वाहन आत येताच पावती फाडावी लागत आहे. या प्रकारामुळे कामासाठी प्रशासकीय भवनात येणाºया सामान्य नागरिकांची लूट होत आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देत वाहनतळाचे कंत्राट रद्द करून सामान्यांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालय तथा प्रशासकीय भवन परिसरात अनेक नागरिक आपली कामे घेऊन येतात. या भवनात तब्बल १८ शासकीय कार्यालये आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही दररोजच येथे यावे लागते. यामुळे प्रशासकीय भवन परिसरात असंख्य वाहने असतात. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अधिकारी, कर्मचाºयांना ही वाहने सुरळीत लावण्याच्या तथा शासकीय कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचा विपर्यास करीत महसूल कर्मचारी संघटनेने अनधिकृतरित्या वाहनतळाचे कंत्राट खासगी व्यक्तीला दिले. यात मोठा व्यवहार झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.प्रशासकीय भवनातील वाहन तळाचे कंत्राट मिळावे म्हणून दिव्यांगांनी प्रयत्न केले होते; पण या कर्मचाºयांनी त्यांना कंत्राट न देता मर्जीतील खासगी व्यक्तीला कंत्राट देत सामान्यांच्या लुटीचा मार्गच मोकळा करून दिला आहे. या कंत्राटदाराने वसुलीचा कळस गाठला. प्रशासकीय भवनाच्या दोन्ही मुख्य प्रवेश दारांवर फलक लावले व तेथेच एकाची नियुक्ती केली. कुठलेही वाहन फाटकातून आत आले की त्याला वाहन ठेवण्यासाठी पाच रुपयांची पावती फाडावी लागते. मग, आतमध्ये वाहन कसेही व कुठेही लावले वा चोरीस गेले तरी जबाबदारी घेत नसल्याने असंतोष पसरला आहे.वाहनांसाठी पैसे आकारणारा वर्धा बहुदा राज्यातील पहिलाच जिल्हाजिल्हाधिकारी कार्यालय तथा प्रशासकीय भवनांमध्ये जिल्हाभरातून नागरिक येत असतात. हे नागरिक आपली लहान-मोठी कामे घेऊन प्रवासासाठी तथा पेट्रोलसाठी खर्च करून जिल्हास्थळ गाठतात. शिवाय शासकीय कार्यालये नागरिकांच्या सेवेसाठीच असतात. यामुळे तेथे वाहने ठेवण्याकरिता पैसे आकारणे योग्य नाही. राज्यात कुठेही प्रशासकीय भवनात अशा प्रकारचे वाहनतळ आढळून येत नाही; पण वर्धा जिल्ह्याच्या प्रशासकीय भवनात मात्र सामान्य नागरिकांकडून वाहने उभी करण्याकरिता पैसे आकारले जात आहे. वाहनांसाठी पैसे आकारणारा राज्यातील वर्धा हा बहुदा पहिलाच जिल्हा असल्याचे बोलले जात आहे. शिवाय वाहनतळाचा कंत्राटदार तथा महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारीही मुजोरीवर उतरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याकडे जातीने लक्ष देत वाहनतळाचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी सामान्यांतून होत आहे.जिल्हाधिकाºयांच्या परवानगीनेच वाहनतळ सुरू केले असून नाममात्र शुल्क आकारत आहे. नागरिकांना शिस्त लागावी म्हणून हे वाहनतळ निर्माण केले आहे. कुठेही वाहने लावली जात असल्याने रस्ता राहत नव्हता. अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांना पासेस दिल्या जाणार आहेत.- संजय मानेकर, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, वर्धा. 

टॅग्स :Parkingपार्किंग