शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:12 IST

कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे.

ठळक मुद्देकायदा तोडणाºया व्यापाºयांची अध्यक्ष सचिवांकडून पाठराखण

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. पण सध्या हा कायदा धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतकºयांची लूट होत असल्याचे दिसत आहे.कापूस व सोयाबीन खरेदी करताना शेतमालाची प्रत खराब असल्याचे कारण सांगून लुटणाºया व्यापाºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व संचालकांचे संरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नजरेसमोर खासगी व्यापारी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची आर्थिक लुट करीत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.सोयाबीन प्रति क्विंटल ३०५० व कापसाला प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भाव शेतकºयांना अजिबात परवडणारा नाही. पण शेतकºयांजवळ कोणताच पर्याय उरला नाही. शेतमाल घरी आल्याने तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकण्यासाठी आणत आहे. सध्या चांगल्या सोयाबीनला २४०० ते २५०० रुपये व्यापारी देत आहे. यात शेतकरी प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी नागविल्या जात आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यावर हेच सोयाबीन व्यापारी जवळच्या शेतकºयांच्या नावावर ३०५० रुपयांनी विक्रीसाठी केंद्रावर नेईल.काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकतीच आवारात खासगी व्यापाºयांनी बाजार समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. या शुभारंभाच्या दिवशी कापसाला व्यापाºयांनी ३७०० ते ४०३१ भाव देवून कापूस उत्पादकांची बोळवण केली. सदर प्रकार बाजार समितीच्या संचालकासमोर घडत आहे. वास्तविक पाहता सध्या समितीत विक्रीसाठी येणारा कापूस सितादहीचा कापूस आहे. तो कापूस प्रतवारीने खराब असूच शकत नाही. फक्त तो परतीच्या मानून पावसाने ओला झाला आहे. शेतकºयांनी तो वाळवून बाजारात आणला तरी पण काही ओलावा कापसात राहतो. हे मान्य केले तर प्रति क्विंटल १ ते २ किलो ओलावा तुट कापून हमीभावाने कापूस खरेदी करणे न्यायोचित असून या प्रकारातून खरेदी अपेक्षित आहे.