शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:12 IST

कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे.

ठळक मुद्देकायदा तोडणाºया व्यापाºयांची अध्यक्ष सचिवांकडून पाठराखण

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. पण सध्या हा कायदा धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतकºयांची लूट होत असल्याचे दिसत आहे.कापूस व सोयाबीन खरेदी करताना शेतमालाची प्रत खराब असल्याचे कारण सांगून लुटणाºया व्यापाºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व संचालकांचे संरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नजरेसमोर खासगी व्यापारी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची आर्थिक लुट करीत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.सोयाबीन प्रति क्विंटल ३०५० व कापसाला प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भाव शेतकºयांना अजिबात परवडणारा नाही. पण शेतकºयांजवळ कोणताच पर्याय उरला नाही. शेतमाल घरी आल्याने तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकण्यासाठी आणत आहे. सध्या चांगल्या सोयाबीनला २४०० ते २५०० रुपये व्यापारी देत आहे. यात शेतकरी प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी नागविल्या जात आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यावर हेच सोयाबीन व्यापारी जवळच्या शेतकºयांच्या नावावर ३०५० रुपयांनी विक्रीसाठी केंद्रावर नेईल.काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकतीच आवारात खासगी व्यापाºयांनी बाजार समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. या शुभारंभाच्या दिवशी कापसाला व्यापाºयांनी ३७०० ते ४०३१ भाव देवून कापूस उत्पादकांची बोळवण केली. सदर प्रकार बाजार समितीच्या संचालकासमोर घडत आहे. वास्तविक पाहता सध्या समितीत विक्रीसाठी येणारा कापूस सितादहीचा कापूस आहे. तो कापूस प्रतवारीने खराब असूच शकत नाही. फक्त तो परतीच्या मानून पावसाने ओला झाला आहे. शेतकºयांनी तो वाळवून बाजारात आणला तरी पण काही ओलावा कापसात राहतो. हे मान्य केले तर प्रति क्विंटल १ ते २ किलो ओलावा तुट कापून हमीभावाने कापूस खरेदी करणे न्यायोचित असून या प्रकारातून खरेदी अपेक्षित आहे.