शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

लोकसभेत ‘आप’ला नाकारले

By admin | Updated: May 17, 2014 02:13 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल

वर्धा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल अशी चर्चा राजकीय तज्ज्ञ करीत होते. मात्र जिल्ह्यातच नव्हे राज्यातही आपला अपयश आल्याचे समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात आपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे या पक्षाची ओळखही कायम करण्यात अपयश आले. वर्धेकर एवढय़ावरच थांबले नाही तर आपच्या उमेदवाराची जमानतही जप्त करीत त्याला नाकारले.दिल्लीतील आलेल्या यशामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी उमेदवारही उभे केले. आपचाच उमेदवार वर्धा लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर राहील, असे सर्वांना वाटत होते. मात्र हा उमेदवार अपक्षाच्या तुलनेतही मागे पडला.आपची उमेदवारी देताना राज्यात नागरिकांतून मते मागविण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी देण्यात येणार असल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले होते. आपच्या सदस्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणातून वर्धेतून आर्वी येथील मो. अलीम पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांचा प्रचारही सुरू झाला होता. हातात झाडू घेवून भ्रष्ट्राचार मुक्त सत्ता देण्याचा मानस आपच्यावतीने व्यक्त करण्यात आला. रस्त्यातून हातात झाडू घेत भेटणार्‍या प्रत्येक मतदाराच्या डोक्यात टोपी घालत मत मागणार्‍या आपच्या अलिम पटेल यांना वर्धेकर मतदारांनी साफ नाकारले.अलीम पटेल यांना उमेदवारी देताना मुस्लिम समाजाची गठ्ठा मते त्यांना मिळतील असे राजकीय वेिषकांकडून सांगण्यात येत होते. मात्र येथे तसे झाले नाही. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देवून उत्तम शासन देण्याचा आपचा प्रयत्न असल्याचे पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल राज्यात प्रचारादरम्यान सांगत होते. त्यांचे हे प्रयत्न अंमलात आणण्याकरिता रिंगणात असलेल्या आपच्या उमेदवारांना वर्धेतच नाही तर राज्यातही नाकारण्यात आले. त्यांचे बोटावर मोजण्याइतपतच उमेदवार निवडून आले.आपचा उमेदवार जी मते घेईल त्याचा लाभ काँग्रेसला होईल असे गणित मांडण्यात येत होते. मात्र निकालाच्या दिवशी मांडण्यात आलेली गणिते कुठे उलटली हे कुणालाही समजले नाही. वर्धेत आपचा उमेदवार उभा होता व त्याने घेतलेल्या मताचा दुसर्‍या पक्षाच्या वा इतर कुठल्याही उमेदवारावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने हे त्याने घेतलेल्या मतांवरून समोर आले आहे. यामुळे या निवडणुकीत आपचा उमेदवार पक्षाची काही तरी छाप सोडेल असे सार्‍यांना वाटले होते मात्र तसे झाले नाही. उलट पक्षाची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरले.(प्रतिनिधी)