शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत ‘आप’ला नाकारले

By admin | Updated: May 17, 2014 02:13 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल

वर्धा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल अशी चर्चा राजकीय तज्ज्ञ करीत होते. मात्र जिल्ह्यातच नव्हे राज्यातही आपला अपयश आल्याचे समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात आपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे या पक्षाची ओळखही कायम करण्यात अपयश आले. वर्धेकर एवढय़ावरच थांबले नाही तर आपच्या उमेदवाराची जमानतही जप्त करीत त्याला नाकारले.दिल्लीतील आलेल्या यशामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी उमेदवारही उभे केले. आपचाच उमेदवार वर्धा लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर राहील, असे सर्वांना वाटत होते. मात्र हा उमेदवार अपक्षाच्या तुलनेतही मागे पडला.आपची उमेदवारी देताना राज्यात नागरिकांतून मते मागविण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी देण्यात येणार असल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले होते. आपच्या सदस्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणातून वर्धेतून आर्वी येथील मो. अलीम पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांचा प्रचारही सुरू झाला होता. हातात झाडू घेवून भ्रष्ट्राचार मुक्त सत्ता देण्याचा मानस आपच्यावतीने व्यक्त करण्यात आला. रस्त्यातून हातात झाडू घेत भेटणार्‍या प्रत्येक मतदाराच्या डोक्यात टोपी घालत मत मागणार्‍या आपच्या अलिम पटेल यांना वर्धेकर मतदारांनी साफ नाकारले.अलीम पटेल यांना उमेदवारी देताना मुस्लिम समाजाची गठ्ठा मते त्यांना मिळतील असे राजकीय वेिषकांकडून सांगण्यात येत होते. मात्र येथे तसे झाले नाही. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देवून उत्तम शासन देण्याचा आपचा प्रयत्न असल्याचे पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल राज्यात प्रचारादरम्यान सांगत होते. त्यांचे हे प्रयत्न अंमलात आणण्याकरिता रिंगणात असलेल्या आपच्या उमेदवारांना वर्धेतच नाही तर राज्यातही नाकारण्यात आले. त्यांचे बोटावर मोजण्याइतपतच उमेदवार निवडून आले.आपचा उमेदवार जी मते घेईल त्याचा लाभ काँग्रेसला होईल असे गणित मांडण्यात येत होते. मात्र निकालाच्या दिवशी मांडण्यात आलेली गणिते कुठे उलटली हे कुणालाही समजले नाही. वर्धेत आपचा उमेदवार उभा होता व त्याने घेतलेल्या मताचा दुसर्‍या पक्षाच्या वा इतर कुठल्याही उमेदवारावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने हे त्याने घेतलेल्या मतांवरून समोर आले आहे. यामुळे या निवडणुकीत आपचा उमेदवार पक्षाची काही तरी छाप सोडेल असे सार्‍यांना वाटले होते मात्र तसे झाले नाही. उलट पक्षाची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरले.(प्रतिनिधी)