शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Lok Sabha Election 2019; गरिबांचे भले करणारे सरकार हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:13 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआर्वी ते वरूड 60 किमी

पुरुषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.बाबुराव गोहते नामक वरूड येथील प्रवाशाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे हीत जपणारे सरकार हवे, गरीबांचे कल्याण झाले पाहिजे, असे सांगितले. कोणता उमेदवार बाजी मारणार याविषयीही मतदारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवादी ठार झाले, अशी खमकी हिम्मत दाखविणारे नेतृत्वच देशाला पुढे नेवू शकते, असेही तरूण प्रवाशांचे मत पडले. वरूड येथील वॉर्ड क्रं. १८ मधील केदार चौक येथील निवासी ज्योती प्रकाश शिरभाते यांनी विद्यमान केंद्रसरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र गरिबांसाठी आणखी योजना हव्या, असे सांगितले. मतदार एका दिवसाचा राजा असतो. बाकी पाच वर्षे तो गुलाम आहे. अनेक उमेदवार खासदार पाच वर्षे तोंडही दाखवित नाही, अशी प्रतिक्रिया या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास झाला. बॅँकेत वारंवार जावे लागले, असे सांगितले.संत्र्यांचे वैभव गेलेआर्वी, वरूड, मोर्शी हा संत्र्याचा पट्टा परंतु या पट्ट्यात गेल्या काही वर्षात संत्र्यांचे उत्पादन प्रचंड घटले. पाण्याअभावी संत्रा लावणे शेतकऱ्यांनी सोडून दिले. संत्र्याला गतवैभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.शेतमालाचा भाव दरवर्षी वाढला पाहिजे, मात्र तसे होत नाही. भावाची शाश्वती असायलाच पाहिजे. तेव्हाच शेती परवडेल, अशी भूमिका काहींनी मांडली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019