शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; गरिबांचे भले करणारे सरकार हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:13 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआर्वी ते वरूड 60 किमी

पुरुषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.बाबुराव गोहते नामक वरूड येथील प्रवाशाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे हीत जपणारे सरकार हवे, गरीबांचे कल्याण झाले पाहिजे, असे सांगितले. कोणता उमेदवार बाजी मारणार याविषयीही मतदारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवादी ठार झाले, अशी खमकी हिम्मत दाखविणारे नेतृत्वच देशाला पुढे नेवू शकते, असेही तरूण प्रवाशांचे मत पडले. वरूड येथील वॉर्ड क्रं. १८ मधील केदार चौक येथील निवासी ज्योती प्रकाश शिरभाते यांनी विद्यमान केंद्रसरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र गरिबांसाठी आणखी योजना हव्या, असे सांगितले. मतदार एका दिवसाचा राजा असतो. बाकी पाच वर्षे तो गुलाम आहे. अनेक उमेदवार खासदार पाच वर्षे तोंडही दाखवित नाही, अशी प्रतिक्रिया या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास झाला. बॅँकेत वारंवार जावे लागले, असे सांगितले.संत्र्यांचे वैभव गेलेआर्वी, वरूड, मोर्शी हा संत्र्याचा पट्टा परंतु या पट्ट्यात गेल्या काही वर्षात संत्र्यांचे उत्पादन प्रचंड घटले. पाण्याअभावी संत्रा लावणे शेतकऱ्यांनी सोडून दिले. संत्र्याला गतवैभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.शेतमालाचा भाव दरवर्षी वाढला पाहिजे, मात्र तसे होत नाही. भावाची शाश्वती असायलाच पाहिजे. तेव्हाच शेती परवडेल, अशी भूमिका काहींनी मांडली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019