शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:38 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देटक्केवारी वाढविण्यावर भर : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रीय पक्षांसह नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष व अपक्ष अशा एकूण १६ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले होते. ते सर्व नामांकन अर्ज वैध ठरविले असून गुरुवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले असून ती यादी मान्यतेकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत असून मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती.निवडणुकीकरिता प्रशासन सज्जनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पुरेशा कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मशीन हाताळण्याचे दुसरे प्रशिक्षण पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहे. तसेच निवडणूक कार्यात असलेले व इतरही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनी मतदानाचा अधिकार बजवावा याकरिताही नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सोबतच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता २ डीवायएसपी, ६ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाचे तीन तुकड्या तैनात राहणार आहेत. एका तुकडीत ३० जवानांचा समावेश असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.मतदानापूर्वीच झाली ईश्वरचिठ्ठीएरव्ही मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी साधारणत: ईश्वरचिठ्ठी करून उमेदवाराच्या भाग्याचा फैसला केला जातो. परंतुल, आज दोन उमेदवारांनी एकाच निवडणूक चिन्हाची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिल्यानंतर नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हाची निवड करायची होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी व आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे या दोघांनीही एकाच चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या ईश्वरचिठ्ठीत गाढवे यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह देण्यात आले तर वंजारी यांना दुसरे चिन्ह दिले.