शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:38 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देटक्केवारी वाढविण्यावर भर : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रीय पक्षांसह नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष व अपक्ष अशा एकूण १६ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले होते. ते सर्व नामांकन अर्ज वैध ठरविले असून गुरुवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले असून ती यादी मान्यतेकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत असून मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती.निवडणुकीकरिता प्रशासन सज्जनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पुरेशा कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मशीन हाताळण्याचे दुसरे प्रशिक्षण पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहे. तसेच निवडणूक कार्यात असलेले व इतरही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनी मतदानाचा अधिकार बजवावा याकरिताही नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सोबतच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता २ डीवायएसपी, ६ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाचे तीन तुकड्या तैनात राहणार आहेत. एका तुकडीत ३० जवानांचा समावेश असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.मतदानापूर्वीच झाली ईश्वरचिठ्ठीएरव्ही मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी साधारणत: ईश्वरचिठ्ठी करून उमेदवाराच्या भाग्याचा फैसला केला जातो. परंतुल, आज दोन उमेदवारांनी एकाच निवडणूक चिन्हाची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिल्यानंतर नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हाची निवड करायची होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी व आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे या दोघांनीही एकाच चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या ईश्वरचिठ्ठीत गाढवे यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह देण्यात आले तर वंजारी यांना दुसरे चिन्ह दिले.