शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Lok Sabha Election 2019; पंतप्रधान शेतकरी व शेतीबद्दल बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:29 IST

देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉँग्रेस शेतकऱ्यांचा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच कॉँग्रेससोबत स्वाभीमान शेतकरी संघटना, रिपाई आदीसारखे पक्ष सोबत आले आहे. देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.या सभेला कॉँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. पंतप्रधानांना शेतकरी व गरीबांशी गळा मिळविताना कुणीही पाहिले नाही. ते अंबानी, अदानी यांच्याशीच गळा मिळवितात. ते श्रीमंताचे चौकीदार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. या सभेला स्वाभीमान शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, रिपाई (ग.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, कॉँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कॉँग्रेसने संविधानाचे रंक्षण करण्याचे काम केल्याचे सांगितले. तब्बल ३३ मिनीटे राहुल गांधी यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक धामणगाव (रेल्वे) चे आमदार विरेंद्र जगताप तर आभार जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी मानले.

उमेदवाराने नाही साधला मतदाराशी संवाद लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा शुक्रवारी पार पडली. या जाहीर सभेला उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस उपस्थित होत्या. परंतु त्यांनी राहुल गांधी येण्यापूर्वी किंवा राहुल गांधी आल्यानंतर सभेला आलेल्या मतदाराशी संवाद साधला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये याची चर्चा दिसून आली.

अन् भाषणादरम्यान सुरक्षा रक्षकाने दिली चिठ्ठी राहूल गांधी यांचे हेलिकॉप्टम ५.०५ वाजता वर्धेच्या आकाशात झळकले. हे हेलिकॉप्टर ५.०७ वाजता हेलिपॅडवर लॅन्ड झाल्यानंतर राहूल गांधी हे सभा स्थळ गाठून ५.१४ वाजता व्यासपीठावर चढले. राहूल गांधी हे भाषण देत आताना एका सुरक्षा रक्षकाने ५.५४ वाजता एक चिठ्ठी त्यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी राहूल गांधी यांनी भाषण आटोपले, हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019