शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पंतप्रधान शेतकरी व शेतीबद्दल बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:29 IST

देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉँग्रेस शेतकऱ्यांचा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच कॉँग्रेससोबत स्वाभीमान शेतकरी संघटना, रिपाई आदीसारखे पक्ष सोबत आले आहे. देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.या सभेला कॉँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. पंतप्रधानांना शेतकरी व गरीबांशी गळा मिळविताना कुणीही पाहिले नाही. ते अंबानी, अदानी यांच्याशीच गळा मिळवितात. ते श्रीमंताचे चौकीदार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. या सभेला स्वाभीमान शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, रिपाई (ग.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, कॉँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कॉँग्रेसने संविधानाचे रंक्षण करण्याचे काम केल्याचे सांगितले. तब्बल ३३ मिनीटे राहुल गांधी यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक धामणगाव (रेल्वे) चे आमदार विरेंद्र जगताप तर आभार जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी मानले.

उमेदवाराने नाही साधला मतदाराशी संवाद लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा शुक्रवारी पार पडली. या जाहीर सभेला उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस उपस्थित होत्या. परंतु त्यांनी राहुल गांधी येण्यापूर्वी किंवा राहुल गांधी आल्यानंतर सभेला आलेल्या मतदाराशी संवाद साधला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये याची चर्चा दिसून आली.

अन् भाषणादरम्यान सुरक्षा रक्षकाने दिली चिठ्ठी राहूल गांधी यांचे हेलिकॉप्टम ५.०५ वाजता वर्धेच्या आकाशात झळकले. हे हेलिकॉप्टर ५.०७ वाजता हेलिपॅडवर लॅन्ड झाल्यानंतर राहूल गांधी हे सभा स्थळ गाठून ५.१४ वाजता व्यासपीठावर चढले. राहूल गांधी हे भाषण देत आताना एका सुरक्षा रक्षकाने ५.५४ वाजता एक चिठ्ठी त्यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी राहूल गांधी यांनी भाषण आटोपले, हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019