शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:17 IST

आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सिंदी (रेल्वे) येथील सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील, तर विरोधी पक्षाचे उमेदवार चारूलता टोकस यांना भेटायला १०९२ कि. मी. गुडगावला जावे लागेल. आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ सिंदी रेल्वे येथील झेंडा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, नगराध्यक्ष संगीता शेंडे, जि. प सदस्य विजय आगलावे, किशोर शेंडे, विनोद लाखे, किशोर दिघे, योगेश फुसे, किशोर भांदककर, सुधाकर घवघवे, पळसगावचे सरपंच धीरज लेंडे इत्यादी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांची मांडवस. मांडवसीच्या दिवशी जो माणूस चांगले काम करतो, त्याला पुन्हा कामावर ठेवल्या जाते, जो काम करीत नाही, त्याला कामावरून काढल्या जाते. रामदास तडस यांनी पाच वर्षांत विकासाची चांगली कामे केली आहे. त्यांना एक्स्टेंशन द्यायचं, ११ तारखेला मत देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवायचे, अशी साद त्यांनी मतदारांना घातली.या प्रसंगी उमेदवार रामदास तडस यांनी आपण पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढा मतदारांपुढे वाचला. ५५ वर्षांत झाले नाही ते काम ५ वर्षात करून दाखविले. सिंदीमध्ये ड्रायपोर्ट, उड्डाणपूल, आदी अनेक विकासकामे या मतदारसंघात केली. वर्धा जिल्ह्यात राव घराण्याने ४८ वर्षे राज्य केले. परंतु विकास मात्र कुठे दिसलाच नाही. काँग्रेसला उमेदवारसुद्धा मिळणे मुश्किल होते, काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, गरीबी हटली, मात्र काँग्रेस नेत्यांची, सामान्य माणसाची नाही. वर्ध्याचा विकास पुन्हा जोमात करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन तडस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश राठी यांनी केले. पंकज पराते यांनी आभार मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019