शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; छुपी बंडखोरी करणार काँग्रेसचा ‘गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:13 IST

बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेतले आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते व त्यांचे समर्थक मागील दोन दिवसांपासून खुलेआम आघाडीविरोधात प्रचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या अडचणी वाढतच आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या विरोधात ‘राष्ट्रवादी’ खुलेआम मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेतले आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते व त्यांचे समर्थक मागील दोन दिवसांपासून खुलेआम आघाडीविरोधात प्रचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या अडचणी वाढतच आहेत.काँग्रेसमध्ये पूर्वी प्रभाराव यांचा प्रबळ गट होता. त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. विविध जाती-पंथाच्या लोकांना त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणले होते. विविध मतदारसंघात त्या कौटुंबिक नातेसंबंध जपत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही परंपंरा खंडित झाली. काँग्रेस जिल्ह्यात तीन गटांत विभागली. यात आमदार रणजित कांबळे, आमदार अमर काळे, शेखर शेंडे यांच्या गटांचा समावेश आहे. या तिघांमधून विस्तवही जात नाही, अशी आज स्थिती आहे. राहुल गांधींच्या गांधीजयंतीच्या सभेनंतरही काँग्रेसमधील वाद उफाळून आला. आता निवडणुकीत टोकस यांना गरज असल्याने शेंडे, काळे यांची मदत घेण्याची नमती भूमिका रणजित कांबळे यांनी घेतली. परंतु, या दोन्ही गटांना कांबळे यांच्याकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याची पक्षांतर्गत खदखद बाहेर येत आहे. दुसरीकडे देवळी-पुलगाव मतदारसंघात रणजित कांबळेंची मक्तेदारी संपविण्याचा विडा सहकार गटाने उचलला आहे. ‘कांबळे हटाव’ हा नारा आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत बुलंद करायचा आहे, अशी माहिती सहकार गटाच्याच नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. गटबाजी शमविण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने हे बंडखोरच काँग्रेसचा गेम करण्याच्या तयारीत आहेत.अमर काळेनांही काँग्रेस नेतृत्वाचा त्रासमागील १५ वर्षांपासून आर्वी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे अमर काळे हे काँग्रेसमधील लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. शरद काळे यांच्यापासून काळे कुटुंबीयांनी या मतदार संघात आपली एकहाती सत्ता टिकवून ठेवली. मात्र, काळेंना नेहमी शह देण्याचे काम प्रभाताई राव व रणजित कांबळे यांनी सुरू ठेवले. डॉ. काळे यांच्या निधनानंतर अमर यांना तिकीट मिळू नये इथपासून तर त्यांना मंत्रिपदापासून रोखण्याचेही काम जिल्ह्यातील याच गटाने केल्याची भावना काळे समर्थक उघडपणे मांडत आहेत. या साऱ्या बाबी काँग्रेस उमेदवारासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत.हिंगणघाटात राष्ट्रवादी दुभंगलीहिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.सुधीर कोठारी यांच्या गटात दुभंगली आहे. त्यामुळे कोठारींकडे काँग्रेसने काम सोपविले आहे. तिमांडे राहुल गांधीच्या सभेला आले, परंतु काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास नाही, अशी परिस्थिती त्यांच्या समर्थकांनीच कथन केली आहे. दुसरीकडे शेखर शेंडे यांच्या वर्धा विधानसभा मतदारसंघात शेंडे यांना अडचणीचे ठरणारे जि. प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल व शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांना विधानसभेचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम युद्धपातळीवर रणजित कांबळे करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची राहुल गांधींसह अशोक चव्हाण यांच्याशी गाठभेट घालून देण्यात आली. शेंडेंना पक्षाच्या प्रचारापासून रोखण्यासाठी कांबळे यांनी ही खेळी खेळल्याचे शेंडेंचे सेलू तालुक्यातील समर्थक उघडपणे बोलत आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019wardha-pcवर्धा