शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: July 8, 2014 23:35 IST

शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली,

किसान अधिकार अभियानचे आंदोलन : नाफेडकडे थकले चुकाऱ्याचे कोट्यवधी रुपयेवर्धा/घोराड : शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली, चर्चा केली; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे त्रस्त होऊन सोमवारी किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले़ या प्रकरणी किसान अधिकारच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला़सेलू तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नाफेडला चना, तुरी विकल्यात़ रोखीने वा दहा दिवसांच्या आत चुकारे देण्याची हमी शासनामार्फत देण्यात आली होती; पण कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना चुकारेच देण्यात आलेले नाहीत़ यामुळे केवळ सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी ५२ लाख रुपये अडकले आहेत़ जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा येथील नाफेडची शासकीय आधारभूत हमी भावात किमतीनुसार खरेदी करण्यात आली. नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे २१ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे अद्यापही अदा करण्यात आले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे ५७ लाख रुपये नाफेडकडे अडकले आहेत़ ६ मे पासून चन्याचे चुकारेही देण्यात आलेले नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांचे २ कोटी ९५ लाख रुपये थकले आहेत़ चुकाऱ्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही शासनाकडून अद्याप तुरी व चन्याच्या चुकाऱ्यापोटी थकलेले ३ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ यावर्षी खरीप हंगामात अद्यापही पाऊस आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे़ खते, बी-बियाणे यांची खरेदी उसनवारीने केली़ आता पुन्हा बी-बियाणे, खते कसे खरेदी करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शासनाकडे रक्कम थकली असताना ती उपयोगी पडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या गंभीर बाबीकडे लक्ष देत शासनाने शेतकऱ्याचे तुरी व चण्याचे चुकारे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसान अधिकार अभियान व शेतकऱ्यांनी केली आहे़ यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले़यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण शेतकऱ्यांना मदत करू शकत नसेल तर ते प्रशासन काय उपयोगाचे, अशी भूमिका घेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन पूर्ण करण्यात आले़ यात किसान अधिकारचे मुख्य पे्ररक अविनाश काकडे, पंढरी ढगे, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)