शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

कार प्रकल्पग्रस्तांचे लोटांगण आंदोलन

By admin | Updated: August 29, 2015 02:11 IST

कारंजा (घा.) व आष्टी (श.) तालुक्यातील कार नदी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांना १६ वर्ष लोटूनही मोबदाला मिळलेला नाही.

प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : कारंजा (घा.) व आष्टी (श.) तालुक्यातील कार नदी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांना १६ वर्ष लोटूनही मोबदाला मिळलेला नाही. अनेकवार निवेदने व आंदोलन करून शासन पावले उचलायला तयार नाहीत. तसेच कारंजा तालुक्यातील लादगड येथील गारपीट व अतिवृष्टीग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासकीय दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले. जिल्ह्यातील कारंजा व आष्टी तालुक्यातील कार प्रकल्पाचे काम झालेले आहे. प्रकल्पातील मौजा सुसुंद्रा व माणिकवाडा या गावामध्ये कालव्याचे काम झाले असून त्याला आता १६ वर्षे लोटले आहेत. सदर काम करतेवेळी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे जमीन अधिकग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून मोबदला द्यावा अशी मागणी १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी अनेकवेळा लेखी तक्रार देऊनही अद्याप सुसुंद्रा व माणिकवाडा मौजातील शेतकऱ्यांना कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. सर्व शेतकरी १६ वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कार प्रकल्पाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत; परंतु कागदी घोडे नाचविल्याशिवाय काहीही करण्यात न आल्याचा आरोप पीडित शेतकरी करीत आहे. अधिग्रहण प्रक्रियेस सुरुवात होऊन दोन वर्षे लोटली. अद्यापही त्या शेतकऱ्यांना कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदलाच मिळालेला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी प्रहारचे बाळा जगताप यांच्यासह आज आंदोलनाचा मार्ग स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर लोटांगण आंदोलन केले. यात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत शिष्टमंडळाशी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी चर्चा करीत याप्रकरणी त्वरीत कारवाई करणार असल्याचे सांगितले. आंदोलनात कार येथील शेकडो प्रकल्पग्रस्त व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) गारपीटग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा२०१५ मध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमध्ये कारंजा तालुक्यातील मासोद, लादगड येथील शेतकऱ्यांचे गहू व चना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु काही ठराविक शेतकऱ्यांनाच याचा लाभ देण्यात आल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे. ज्यांना लाभ मिळाला त्यांची रक्कम बँक आॅफ इंडियाने थकीत कर्जात कापली आहे. ज्या पटवाऱ्याने ही नावे पाठविली त्याची चौकशी केली असता त्याने तहसील कार्यालयात मोजक्याच शेतकऱ्यांची नावे दिल्याचे उघड झाले. याबाबत शेतकऱ्यांनी सदर पटवाऱ्यास याचा जाब विचारला असता मी वैद्यकीय रजेवर आहे, मला त्रास देवू नका, अन्यथा पोलीस तक्रार करून कोर्टात तुम्हास खेचील अशी धमकी दिल्याचे शेतकरी सांगतात. लादगड गावातील ८० टक्के शेतकरी मासोद मौजात येतात. त्यामुळे येथील सरपंच केवळ मासोद येथील रहिवाशांनाच लाभ देतो आणि लादगड येथील शेतकऱ्यांना शासकीय योजनेपासून ठेवत असल्याचा आरोप लादगड येथील शेतकऱ्यानी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्याकरिता लादगड येथील शेतकऱ्यांना लादगड मौजात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे.