शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देऊन शेतकऱ्यांची ७़३० लाखांनी फसवणूक

By admin | Updated: January 18, 2015 23:14 IST

आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची

आयसीआयसीआय बँकेचा प्रताप : आणखी एका शेतकऱ्याची तक्रारप्रशांत हेलोंडे - वर्धाआयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली असून आणखी एका शेतकऱ्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ सदर शेतकऱ्याचेही २ लाख रुपये दलालाने फस्त केले़ या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे़हिंगणघाट आयसीआयसीआय बँकेने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर कर्ज मंजूर केले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येकी पाच ते सात कोरे धनादेश स्वीकारले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ यात पोहणा येथील विवेक बोकारे यांना पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार, कृष्णाजी दुधलकर यांना २ लाख ४३ हजार, गजानन वानखडे यांना १ लाख ७७ हजार ६३१ रुपये तर नानाजी झाडे यांना ४ लाख ६० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले़ यातील बहुतांश रक्कम कोऱ्या धनादेशाच्या बळावर दलालांनीच हडप केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजारांचा फटका बसला़ राहुल त्र्यंबकराव वानखेडे रा़ पोहणा यांनाही बँकेने ८ लाख ५७ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले़ यांचे २ लाख रुपये हेमंत गोल्हर याने धनादेश क्ऱ ९४७१ नुसार विड्रॉल केली़ मुकेश रोडे, रोहन महाजन व हेमंत गोल्हर यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ७ लाख ३० हजार रुपयांनी पाच शेतकऱ्यांना फसविले़ या प्रकरणी पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली़ शिवाय विवेक बोकारे, नानाजी झाडे, गजाजन वानखेडे व कृष्णा दुधलकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले़ या प्रकरणी आयआयसीआय बँक कर्मचारी व दलालांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे़पोलिसांचा तपासही कुचकामीयाबाबत पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली; पण गुन्हे दाखल करण्याशिवाय कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़बँकेने काढले हातयाबाबत आयसीआयसीआय बँक हिंगणघाटचे शाखा व्यवस्थापक अमीत घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बँकेशी दलालांचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले़ यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बँक हात झटकत असल्याचे दिसते़