शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

कर्ज देऊन शेतकऱ्यांची ७़३० लाखांनी फसवणूक

By admin | Updated: January 18, 2015 23:14 IST

आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची

आयसीआयसीआय बँकेचा प्रताप : आणखी एका शेतकऱ्याची तक्रारप्रशांत हेलोंडे - वर्धाआयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली असून आणखी एका शेतकऱ्याने हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ सदर शेतकऱ्याचेही २ लाख रुपये दलालाने फस्त केले़ या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे़हिंगणघाट आयसीआयसीआय बँकेने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर कर्ज मंजूर केले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येकी पाच ते सात कोरे धनादेश स्वीकारले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ यात पोहणा येथील विवेक बोकारे यांना पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार, कृष्णाजी दुधलकर यांना २ लाख ४३ हजार, गजानन वानखडे यांना १ लाख ७७ हजार ६३१ रुपये तर नानाजी झाडे यांना ४ लाख ६० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले़ यातील बहुतांश रक्कम कोऱ्या धनादेशाच्या बळावर दलालांनीच हडप केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजारांचा फटका बसला़ राहुल त्र्यंबकराव वानखेडे रा़ पोहणा यांनाही बँकेने ८ लाख ५७ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले़ यांचे २ लाख रुपये हेमंत गोल्हर याने धनादेश क्ऱ ९४७१ नुसार विड्रॉल केली़ मुकेश रोडे, रोहन महाजन व हेमंत गोल्हर यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ७ लाख ३० हजार रुपयांनी पाच शेतकऱ्यांना फसविले़ या प्रकरणी पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली़ शिवाय विवेक बोकारे, नानाजी झाडे, गजाजन वानखेडे व कृष्णा दुधलकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले़ या प्रकरणी आयआयसीआय बँक कर्मचारी व दलालांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे़पोलिसांचा तपासही कुचकामीयाबाबत पाचही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली; पण गुन्हे दाखल करण्याशिवाय कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़बँकेने काढले हातयाबाबत आयसीआयसीआय बँक हिंगणघाटचे शाखा व्यवस्थापक अमीत घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बँकेशी दलालांचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले़ यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बँक हात झटकत असल्याचे दिसते़