शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:55 IST

खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना : खरीप हंगाम आढावा बैठक, ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर होणार पिकांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, कापसे, गौतम वालदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवल्यास कृषी विभागांने बियाणे उपलब्ध करुन ठेवावे. किड, अतिवृष्टी यासारख्या आपत्तीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कामे करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना फवारणी करताना घडलेल्या दुर्घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करताना मास्क लावणे, बंद कपडे वापरणे इत्यादी विषयी जनजागृती करावी. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथक तयार करावे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त करावे. सोबतच प्रलंबित असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावे, असेही भिमनवार यांनी सांगितले. विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले कनेक्शन जोडणी करुन द्यावे. खरीप हंगाम २०१९-२० मध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र एकूण लागवडी खाली राहणार आहे. यात कापूस २ लाख ३५ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख २५ हजार २५० हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे.७५,७६७ क्विंटल बियाणेयंदाच्या वर्षीसाठी एकूण ७५ हजार ७६७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी २१ हजार ६७८ क्विंटल बियाणे महाबिजकडून तर ५४ हजार ८० क्विंटल बियाणे इतर कंपन्यांकडून पुरविण्यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी १ लाख २६ हजार २७० मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे.८९६ शेततळे पूर्णमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ६७३ शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तर ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करुन शेततळे पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित शेतकीऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नामंजूर करण्यात आले. शिवाय काही शेतकऱ्यांनी शेततळे करण्यासाठी मशीन उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने शेततळे करण्यास नापसंती दर्शविल्याचे याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी सांगितले. त्यावर शेतकºयांना मशीन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCrop Loanपीक कर्ज