शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:55 IST

खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना : खरीप हंगाम आढावा बैठक, ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर होणार पिकांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, कापसे, गौतम वालदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवल्यास कृषी विभागांने बियाणे उपलब्ध करुन ठेवावे. किड, अतिवृष्टी यासारख्या आपत्तीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कामे करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना फवारणी करताना घडलेल्या दुर्घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करताना मास्क लावणे, बंद कपडे वापरणे इत्यादी विषयी जनजागृती करावी. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथक तयार करावे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त करावे. सोबतच प्रलंबित असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावे, असेही भिमनवार यांनी सांगितले. विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले कनेक्शन जोडणी करुन द्यावे. खरीप हंगाम २०१९-२० मध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र एकूण लागवडी खाली राहणार आहे. यात कापूस २ लाख ३५ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख २५ हजार २५० हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे.७५,७६७ क्विंटल बियाणेयंदाच्या वर्षीसाठी एकूण ७५ हजार ७६७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी २१ हजार ६७८ क्विंटल बियाणे महाबिजकडून तर ५४ हजार ८० क्विंटल बियाणे इतर कंपन्यांकडून पुरविण्यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी १ लाख २६ हजार २७० मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे.८९६ शेततळे पूर्णमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ६७३ शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तर ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करुन शेततळे पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित शेतकीऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नामंजूर करण्यात आले. शिवाय काही शेतकऱ्यांनी शेततळे करण्यासाठी मशीन उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने शेततळे करण्यास नापसंती दर्शविल्याचे याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी सांगितले. त्यावर शेतकºयांना मशीन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCrop Loanपीक कर्ज