शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

शेतकऱ्यांच्या कर्जाची दलालांकडून उचल

By admin | Updated: December 27, 2014 22:55 IST

शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़

आयसीआयसीआय बँकेतील प्रताप : संगनमताने व्यवहार झाल्याचा संशयप्रशांत हेलोंडे - वर्धाशेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर झाले असताना रकमेची उचल चक्क दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे़आयसीआयसीआय बँक हिंगणघाट येथून शेतकऱ्यांना सात-बाऱ्यावर कर्ज मंजूर करण्यात आले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येक शेतकऱ्याला पाच ते सात कोरे धनादेश जमा करण्यास सांगितले़ यानुसार शेतकऱ्यांनी धनादेश जमा केले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले़ पोहणा येथील विवेक बोकारे यांना ५ लाख ४० हजार ८०० रुपयांचे कर्ज मंजूर झाले़ पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार रुपये खात्यात जमा झाले़ कृष्णाजी दुधलकर यांना ३ लाख ७७ हजारांचे कर्ज मंजूर करून २ लाख ४३ हजार रुपये खात्यात जमा झाले़ गजानन वानखडे यांना २ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून १ लाख ७७ हजार ६३१ रुपये खात्यात जमा केले़ नानाजी झाडे यांना ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून ४ लाख ६० हजार रुपये जमा केले़ या कर्जातून दुधलकर यांनी ८३ हजार, बोकारे यांनी १ लाख ५० हजार, झाडे यांनी ३ लाख ५० हजार तर वानखडे यांनी ७० हजार १३१ रुपये वापरले़ उर्वरित संपूर्ण रक्कम दलाल व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून फस्त केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजार रुपयांचा फटका बसला़ दलाल मुकेश रोडे याच्यामार्फत गेलेली प्रकरणे आयसीआयसीआय बँकेने मंजूर करून कर्ज दिले़ कागदपत्रे व कोरे धनादेश शेतकऱ्यांनी बँकेचे कर्मचारी सुयोग काळे यांना दिले होते़ कर्मचाऱ्याला दिलेले धनादेश दलालाकडे कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जातील उर्वरित रक्कम मुकेश रोडे व रोहन महाजन यांनी कर्मचाऱ्यांशी संगणमत करून हडप केली़ याबाबत चारही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली़ या प्रकरणी दलाल मुकेश रोडेविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रकरणाचा तपास झुरमुरे यांच्याकडे देण्यात आला आहे़या प्रकरणात बँक व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आल्याचे दिसते़ या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे झाले आहे़