शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दिवसाच लोडिंग-अनलोडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:49 IST

शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाहतुकीचे नियम पायदळी : बंदीनंतरही शहरात शिरतात जड वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शहरात जड वाहनांवर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदीही घालण्यात आली; पण ही बंदी झुगारून अनेक वाहने शहरात शिरकाव करीत असल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीचा पचका होत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचेच यावरून दिसून येते.वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात काही बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते एकेरी करण्यात आले तर शहरात अवजड वाहनांवर दिवसा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुठलीही जड वाहने शहरात शिरणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय शहरात होणारे विविध मालाची लोडींग-अनलोडींग दिवसा न करता रात्री करण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. यासाठी शहरात शिरणाºया मार्गांवर फलक लावण्यात आले आहेत. शहरातील काही मार्गांवरही जड वाहनांना प्रवेश निशिद्ध, असे फलक लावले आहेत; पण या सूचना, फलकांना न जुमानता काही अवजड वाहने शहरात शिरकाव करीत असल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे शहरातील गोदामांमध्ये दिवसा होणारी मालाची लोडींग-अनलोडींग रात्री रहदारी नसताना म्हणजे ९ वाजताच्या नंतर करण्यास सांगण्यात आले. असे असताना काही गोदामांमध्ये दिवसाच हा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाजी चौकातून बॅचलर रोडकडे जाणारा मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे; पण रविवारी दुपारच्या सुमारास या मार्गावर सर्रास रस्त्यावर ट्रक उभा करून मालाची अनलोडींग सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. शिवाय हे सुरू असतानाच दुसरा ट्रक शिवाजी चौकातून या मार्गावर शिरला. तसेच समोरही पावडे चौकाजवळ एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसून आले. यावरून वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेच्या सूचनांना कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात असताना हा प्रकार वारंवार घडत असल्याने शहरातील वाहतुकीत सुधारणा होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांनी लक्ष देत कारवाई करणे तर नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे.पोलीस नसल्याचा फायदाशहरातील वाहतूक व्यवस्था सुधारावी, अनियंत्रिक वाहने चालविणाºयांवर जरब बसावा, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांना कर्तव्यावर ठेवले जाते. पोलिसांकडून चुकीचे आढळल्यास कारवाई केली जाते; पण काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसतात. याच संधीचा फायदा घेत वाहने जड शहरात घुसविली जात असल्याचे दिसून येत आहे. या नियमभंगामुळे शहरातील वाहतुकीचा मात्र पचका झाल्याशिवाय राहत नाही. हे प्रकार दररोज पाहावयास मिळतात. याकडे लक्ष देत अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसारच शहरात दिवसा होणारी लोडींग-अनलोडींग बंद करण्यात आली असून रात्री माल चढविणे व उतरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. शिवाजी चौक ते बॅचलर रोड मार्गही जड वाहनांसाठी दिवसा बंद केला आहे. शिवाजी चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे पाहुन ही वाहने शहरात शिरली असावी. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.