शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

लिजची ‘ती’ ६० प्रकरणेही प्रलंबितच

By admin | Updated: July 5, 2017 00:23 IST

जिल्ह्यासह शहरात लिजच्या जमिनीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून खितपत आहे. नगर परिषदेच्या निवडणूक काळात ६० मालमत्ता धारकांच्या लिजची प्रकरणे निकाली निघाल्याचा गवगवा केला होता.

निवडणूक काळात बोभाटा : खरेदी-विक्री व्यवहार ठप्पचलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यासह शहरात लिजच्या जमिनीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून खितपत आहे. नगर परिषदेच्या निवडणूक काळात ६० मालमत्ता धारकांच्या लिजची प्रकरणे निकाली निघाल्याचा गवगवा केला होता. वास्तविक, ती ६० प्रकरणेही अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. ही माहिती आरटीआय अंतर्गत महेश तेलरांधे यांना नगर परिषदेकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर देण्यात आल्या होत्या. अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायमस्वरूपी निर्णय घेतला जात नाही. यामुळे लाखमोलाच्या जागेवर अनेक वर्षांपासून राहत असलेल्या सामान्यांना आदेश नसल्याने विक्री, हस्तांतरण आदी व्यवहार रखडले आहे. जिल्ह्यात ४ हजार ७४२ प्रकरणे प्रलंबित आहेत.शासनाने वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी तसेच धर्मदाय कारणांसाठी जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या. १९२४-२५ पासून जिल्ह्यातील अनेकांना जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत. प्रत्येक ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाडेपट्ट्यांचे नुतनीकरण केले जाते; पण ही प्रक्रिया प्रलंबितच आहे. २०१५-१६ मध्ये त्रिसदस्यीय समितीकडून भाडे निर्धारण करून लिजचे नुतनीकरण करण्यात येणार होते. सदर समितीचा अहवालही सादर झाला; पण कारवाई झाली नाही. यात १९९१ ते २०२१ या कालावधीसाठी लिजचे नुतनीकरण करण्यात येणार होते. यासाठी संबंधितांनी निर्धारित रक्कमही अदा केली; पण अद्याप प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण केली नाही. न.प. निवडणूक काळात लिज प्रकरणाचा तिढा सुटला, ६० नागरिकांच्या लिजचे नुतनीकरण झाले, असे जाहीर करण्यात आले होते. याबाबत आरटीआय कार्यकर्ते महेश तेलरांधे यांनी माहिती मागितली होती. यात एकही प्रकरण निकाली निघाले नसून प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून लिजच्या मुद्याचा निवडणुकीसाठी भाजप कडून वापरच करण्यात आल्याचे स्पष्ट होते. उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार विभाग तथा नगर परिषदेने या प्रकरणी तोडगा काढत प्रकरणे निकाली काढणे गरजेचे झाले आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.