शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१५० हेक्टरमधील पिकांना जीवदान

By admin | Updated: July 11, 2015 02:39 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हमदापूर येथील नाल्यावर सिमेंटनाला बांध यासह ४०० मीटर नाला खोलीकरणामुळे पहिल्याच पावसात...

जलयुक्त शिवार अभियान : हमदापूर येथील सिमेंट नाल्यावर बांध, १०.९० दशलक्ष घनमीटर जलसाठावर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हमदापूर येथील नाल्यावर सिमेंटनाला बांध यासह ४०० मीटर नाला खोलीकरणामुळे पहिल्याच पावसात १०.९० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी डिझेल पंपाद्वारे जलयुक्त शिवार अभियानाचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. या अभियामुळे तब्बल १५० हेक्टरमधील पिकांना जीवदान मिळाले आहे. सेलू तालुक्यातील हमदापूर तसेच आर्वी (छोटी) येथे कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नालाबांध व नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी बी. के. वाघमारे, कृषी पर्यवेक्षक एस. डी. गुट्टे, कृषिसेवक पी. बी. गरूड, ए. एम. रूपनार, देवरे आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील हमदापूर या गावात नालाखोलीकरणाचे काम घेण्यात आले. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी तसेच शेतीला शाश्वत सिंचन मिळावे यासाठी ९ लख खर्च करून ४०० मीटर लांब नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात अडीच मीटर खोल असलेल्या नाल्यात १० दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध झाला. त्यासोबतच परिसरातील १० ते १५ विहिरीतील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीत तसेच विंधन विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गावात पिण्याचे पाणीही उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे हमदापूर हे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले आहे. लोकसभागातून नालाखोलीकरण तसेच उपलब्ध झालेल्या पाण्याच्या वापरासाठी पुढाकार घेऊन गावातील पाणी टंचाईवर मात झाली असल्याचे सरपंच संजय देशमुख यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामुळेच पिके वाचविणे शक्य झाल्याचे स्थानिक शेतकरी सांगिअत आहे. याच प्रकारचा उपक्रम इतरही गावांमध्ये लोकसहभागातून राबवावा अशी मागणीही होत आहे. हमदापूर या गावाची निवड करताना शिवारातून वाहत असलेला नाला पूर्णपणे गाळाने भरला होता. त्यामुळे पावसाळ्यातील पुरात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत होते. तसेच पावसाळ्यात गावातून वाहत जाणारे पाणी नाल्यात शिरून ते गावात शिरत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे सात हजार टीसीएम पिण्याची गरज भागविणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना पिकांसाठी ६ हजार ३१ टीसीएम पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांमुळे शेतीला सुरक्षित सिंचन व रब्बी हंगामातही पीक घेणे शक्य होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बी. के. वाघमारे यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नाला खोलीकरणामुळे गावाला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे शेतीतील उत्पादनामध्येही निश्चितच वाढ होईल.तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन घेणे शक्य होऊन आर्थिक मदतीमुळे सामाजिक परिस्थितीत बदल होत असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)