शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनार्धनच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:17 IST

तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.जनार्धन यांनी संपूर्ण आयुष्य काळ्या आईच्या सेवेत अर्पण केले होते. पारंपारिक शेती करताकरताच आपले मरण आहे, हे त्यांना माहिती झाले होते. त्यांनी मध्यंतरीच्या काळात भाजीपाला शेती केली. वेळेप्रसंगी छोटा मोठा व्यवसायही त्यांनी केला. मागील काही वर्षामध्ये भाजीपाल्याच्या शेतीतून त्यांना चार पैसे मिळायला लागले होते. दरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बोबडे कुटुंबियानी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवदान मिळाले.१४ फेब्रुवारीला शेतकरी जनार्धन हे दुचाकीने शेतातील भाजीपाला घेऊन हिंगणघाटच्या बाजारात गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा बे्रन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दु:खाच्या प्रसंगी मोठ्या हिमतीने जनार्धनचा मुलगा योगेश व बोबडे कुटुंबियानी जनार्धन यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.हिंगणघाट येथील पर्व फाउंडेशनच्या मदतीने शनिवारी नागपूर येथून ग्रीन कॉरीडॉरमधून जनार्धन बोबडे यांचे अवयव गरजूंपर्यंत पोहचविण्यात आले. जनार्धन बोबडे यांचे हृदय आजपर्यंत केवळ शेतीच्या मशागतीसाठी धडधडले. हृदयदान केल्यामुळे त्यांचे हृदय आता चेन्नईला धडकणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे हृदय चेन्नई येथील एका रुग्णाला देण्यात आल्याने त्या रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. तर यकृत औरंगाबाद येथे नेण्यात आले. एक मुत्रपिंड नागपूर येथील व्होकार्टमधील रुग्णाला देण्यात आले आहे. अशाप्रकारे एका शेतकºयाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.