शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

साहित्य, सामाजिक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:55 IST

यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हे, शिरसाट, पोतुलवार, महाजन, बोरूडे, सबाने मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारोहाला संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, सचिव संजय इंगळे तिगावकर, पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. पद्माकर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.या समारोहात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार मुंबई येथील अविनाश कोल्हे यांना ‘चौकट वाटोळी’ या कादंबरीकरिता देण्यात आला. याशिवाय ‘झाली कथा लिहून?’ या कथासंग्रहाकरिता मधुकर धर्मापुरीकर (नांदेड) यांना शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार, मोहन शिरसाट (वाशिम) यांच्या ‘नाही फिरलो माघारी’ संग्रहाला संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार, डॉ. बालाजी पोतुलवार (नांदेड) यांना ‘मराठी स्त्री नाटककार : शोध आणि बोध’ या ग्रंथाकरिता अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाकरिता आबा महाजन (जळगाव) यांना पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार, ‘चिकनगुनिया झालाच पाहिजे’ या कथासंग्रहाकरिता संजय बोरूडे (अहमदनगर) यांना भाऊराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार तर डॉ. दामोदर खडसे लिखित ‘बादलराग’ या कांदबरीच्या मराठी अनुवादासाठी चंद्रकांत भोंजाळ (मुंबई) यांना यशवंतराव दाते स्मृती अनुवाद पुरस्कार देण्यात आला.याशिवाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अरूण सबाने यांना हरीश मोकलकर स्मृती सामाजिक ऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या हस्ते सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांना धनादेश, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर अनुवादित साहित्याची आज दखल घेतल्या जात असल्याबद्दल चंद्रकांत भोंजाळ यांनी समाधान व्यक्त केले. मराठी जगतातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त करीत मोहन शिरसाट यांनी ‘हवी गं तुझ्याकडून माफी’ ही कविता सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. पुरस्कारांबाबतची माहिती डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. रंजना दाते, डॉ. स्मिता वानखेडे, शेषराव बिजवार यांनी मानपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पद्माकर बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डी.के. देशमुख, गुणवंत डकरे, सुरेश वानखेडे, पंडित देशमुख, हेमंत दाते, नरेंद्र दंढारे, सुमती वानखेडे, महेश मोकलकर, अभिजित श्रावणे, अभय शिंगाडे, राजदीप राठोर, राहुल तेलरांधे, आकाश दाते, रजत देशमुख, अनिल काळे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात वºहाडी कवी, गझलकार अमरावती येथील नितीन देशमुख यांची प्रश्न टांगले आभाळाला ही काव्यमैफल रंगली. देशमुख यांचे पैजण आण बिकॉज वसंत इज कमिंग सून हे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून प्रश्न टांगले आभाळाला हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या काव्यमैफलीला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.लेखकांनी मांडल्या भूमिकाएकाच आयुष्यात दोन जीवन जगण्याचा अनुभव वाट्याला आला आहे, अशी भावना व्यक्त करीत अरुणा सबाने या स्त्री ही केवळ स्त्री नसते तर माणूसही असते, ही ओळख कायम ठेवा, असे आवाहन केले. ती जी काल होती, ती आज नाही, हे सिद्ध करणारी जागतिकीकरणाच्या काळातील नव्या पिढीची नायिका चाकटी मोडून जीवन जगणारी आहे, अशी भूमिका कादंबरीकार अविनाश कोल्हे यांनी मांडली.