शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शांतीदूतांच्या नगरीत साहित्यिकांचा मेळा; ९६ व्या. अ.भा.म. साहित्य संमेलनाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2023 07:00 IST

Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या शांतीदूतांच्या नगरीला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार असून शुक्रवारी ग्रंथदिंडीने श्रीगणेशा होणार आहे.

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या शांतीदूतांच्या नगरीला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत साहित्यिकांचा महाकुंभमेळा भरणार असून शुक्रवारी ग्रंथदिंडीने श्रीगणेशा होणार आहे.

शुक्रवारी सकाळी आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, खासदार रामदास तडस तसेच सर्व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दिवसभर या परिसरात भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहे.

विविध ठिकाणांहून महामंडळाचे पदाधिकारी, साहित्यिक, प्रतिनिधी वर्धेत दाखल झाले आहेत. आचार्य विनोबा भावे सभामंडपात सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन, दुपारी ०२.०० वाजता ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद, दुपारी ४.३० वाजता संमेलनाध्यक्षाचे भाषण, सायंकाळी ५.३० वाजता ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ यावर परिसंवाद, सायंकाळी ७ वाजता ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता’ वर परिसंवाद, रात्री ८ वाजता नियंत्रितांचे कविसंमेलन होईल तर मनोहर म्हैसाळकर सभामंडपामध्ये दुपारी २ वाजता कथाकथन, सायंकाळी ६.३० वाजता ‘विदर्भातील बोली भाषा’ यावर परिसंवाद, रात्री ८ वाजता ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम व इतर कार्यक्रम तसेच दुपारी २ वाजता प्रा. देवीदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन, कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्याचे उद्घाटन व दुपारी ४ वाजता ग. त्र्यं. मांडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन होईल.

टॅग्स :literatureसाहित्य