शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मंगरूळात शाळेसमोरच चालते दारूचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:32 IST

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.मंगरूळ गावामध्ये बाहेरगावावरून लोक दारू प्यायला येतात दारू पिलेले मुजोर लोक शाळा महाविद्यालयातील मुलींशी चिडीमारी करतात सदर मद्यधुंद लोकांचा व दारूविक्रेत्यांमुळे गावातील मुली व महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. व तरूण व विद्यार्थी हा व्यसनाच्या आहारी जात आहे. वारंवार स्थानिक पोलीस अधिकाºयांच्या भेटी घेऊन त्यांना माहिती दिली तरीही दारू विक्री सर्रास सुरू आहे, असे नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.निवेदन देताना मंगरूळ येथील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्कल प्रमुख किशोर तांदुळकर, तालुका उपाध्यक्ष संदीप झाडे, पोलीस पाटील अरविंद जोगवे, सरपंच सविता कुकडे, तंटामुक्त अध्यक्ष शेख इस्माईल, ग्रामपंचायत सदस्य संजू तुराळे, सचिन कुबडे, रंजना देशमुख, व्ही.बी.व्ही.पी. जिल्हा अध्यक्ष नीरज बुटे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष योगिता इंगळे, वंदना गावंडे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मयूर फडळे, अमर देशमुख, अ‍ॅड. कपिल गोडघाटे शुभांग मून, सुधा ढोणे, रंजना कुबडे, देविदास तिजारे, सचिन ढोणे, दीपक कुबडे, सागर पाल, अरविंद झाडे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी निवेदन देतांना म्हटले आहे.पोलिसांचे अभय कुणाला? गावकºयांना की दारू विक्रेत्यालामंगरूळ हे गिरड पोलिस ठाण्यातंर्गत येणारे गाव आहे. या ठाण्यातंर्गत दारूबंदीच्या अंमलबजावणीचे अधिकार पोलिसांना आहे. असे असताना शाळा व महाविद्यालयासमोर दुकान लावून दारूविक्री करण्याची हिंमत विक्रेत्याकडे आली कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक या प्रकारामुळे संतप्त असून यात मोठे अर्थकारण कारणीभूत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.