शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

‘लिंक फेल’चा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: May 17, 2015 02:31 IST

सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते.

वर्धा : सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. शनिवारीही काही वेळ असाच प्रकार सुरू असल्याने नागरिकांना ताटकळावे लागते़ सध्या शेतकऱ्यांना ‘नो-ड्यू’ प्रमाणपत्रांची गरज असताना लिंक फेलचा खेळ सुरू असल्याने त्यांना आल्या पावलीच परतावे लागत आहे़ याबाबत भारत संचार निगमकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत़नाचणगाव ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे अनेक वर्षांच्या मागणीनंतर स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा स्थापन करण्यात आली़ स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांचे व्यवहार या बँकेमार्फत चालतात. दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही तसेच बहुतांश व्यवहार एसबीआयमधूनच होत असल्याने व्यापारी, नागरिकांसह शेतकऱ्यांचीही त्याच बँकेकडे धाव असते़ सध्या शेती कामाची व लग्नसराईची धूम आहे़ यामुळे पैसे काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी असते. रोखीचे व्यवहार थोडे कमी झाल्याने नागरिक अधिक पैसा हाताशी न ठेवता तो बँकेत जमा करतात; पण गत तीन दिवसांपासून येथील बीएसएनएल कनेक्शनमध्ये बिघाड आल्याने येथील लिंक फेल झाली आहे. शनिवारीही नाचणगाव येथील एसबीआयमध्ये दारातच ‘लिंक फेल असल्याने कामकाज बंद आहे’ असा फलक पाहावयास मिळाला़ खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना कर्जाची जुळवाजुळव करावयाची आहे़ यासाठी प्रत्येक बँकेतून ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र आणणे शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहे़ शिवाय राष्ट्रीयकृत बँका व सोसायट्या यांना अधिक महत्त्व आहे़ यामुळे सर्वप्रथम शेतकरी स्टेट बँक आॅफ इंडियामध्येच नो ड्यू प्रमाणपत्र घेण्याकरिता जातात; पण गत तीन दिवसांपासून लिंक फेल असल्याने बँकेचे कामकाज ठप्प आहे़ नाचणगाव शाखेत वर्ग केलेल्या शेतकरी खातेदारांना पुलगाव वा अन्य शाखांतून सदर प्रमाणपत्र दिले जात नाही़ यामुळे शेतकऱ्यांना नाचणगाव शाखेतून प्रमाणपत्र न मिळाल्यास रित्या हाताने परत जावे लागत असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)पुलगावात एटीएम बंदमुळे खातेदार त्रस्तनाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत तर पुलगाव येथील एसबीआयचे रेल्वे स्थानकावर लागलेले एटीएम गत अनेक दिवसांपासून बंद आहे़ यामुळे शहरातील एसबीआयच्या ग्राहकांना एकाच एटीएमवर विसंबून राहावे लागते़ बँक आॅफ इंडियाचीही शहरात दोन एटीएम आहेत़ यातील एक एटीएम महिन्यातून १५ दिवस बंद असते़ यामुळे ग्राहकांना शहरातील सर्व एटीएम तपासावे लागत असल्याचे दिसते़रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले एटीएम शहरातील नागरिकांसह प्रवाश्यांकरिता अत्यंत महत्त्वाचे असते; पण गत आठ ते दहा दिवसांपासून सदर एटीएम बंद आहे़ तेथील शटरवर तांत्रिक बिघाडामुळे एटीएम बंद असल्याचे नोंदविण्यात आले आहे़ दहा दिवसांपासून एटीएम मशीनचा बिघाडच दुरूस्त झाला नसल्याचेच यावरून दिसते़ याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तरी जलद कारवाई होत नसल्याने शहरातील खातेदारही त्रस्त झाले आहेत़ असाच प्रकार बॅक आॅफ इंडियाच्या एटीएमचा असून तेही सदोदित बंदच राहत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत़