शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

‘लिंक फेल’चा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: May 17, 2015 02:31 IST

सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते.

वर्धा : सतत तीन दिवसांपासून नाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ‘लिंक फेल’चा खेळ सुरू आहे़ यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. शनिवारीही काही वेळ असाच प्रकार सुरू असल्याने नागरिकांना ताटकळावे लागते़ सध्या शेतकऱ्यांना ‘नो-ड्यू’ प्रमाणपत्रांची गरज असताना लिंक फेलचा खेळ सुरू असल्याने त्यांना आल्या पावलीच परतावे लागत आहे़ याबाबत भारत संचार निगमकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत़नाचणगाव ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे अनेक वर्षांच्या मागणीनंतर स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा स्थापन करण्यात आली़ स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांचे व्यवहार या बँकेमार्फत चालतात. दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही तसेच बहुतांश व्यवहार एसबीआयमधूनच होत असल्याने व्यापारी, नागरिकांसह शेतकऱ्यांचीही त्याच बँकेकडे धाव असते़ सध्या शेती कामाची व लग्नसराईची धूम आहे़ यामुळे पैसे काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी असते. रोखीचे व्यवहार थोडे कमी झाल्याने नागरिक अधिक पैसा हाताशी न ठेवता तो बँकेत जमा करतात; पण गत तीन दिवसांपासून येथील बीएसएनएल कनेक्शनमध्ये बिघाड आल्याने येथील लिंक फेल झाली आहे. शनिवारीही नाचणगाव येथील एसबीआयमध्ये दारातच ‘लिंक फेल असल्याने कामकाज बंद आहे’ असा फलक पाहावयास मिळाला़ खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना कर्जाची जुळवाजुळव करावयाची आहे़ यासाठी प्रत्येक बँकेतून ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र आणणे शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहे़ शिवाय राष्ट्रीयकृत बँका व सोसायट्या यांना अधिक महत्त्व आहे़ यामुळे सर्वप्रथम शेतकरी स्टेट बँक आॅफ इंडियामध्येच नो ड्यू प्रमाणपत्र घेण्याकरिता जातात; पण गत तीन दिवसांपासून लिंक फेल असल्याने बँकेचे कामकाज ठप्प आहे़ नाचणगाव शाखेत वर्ग केलेल्या शेतकरी खातेदारांना पुलगाव वा अन्य शाखांतून सदर प्रमाणपत्र दिले जात नाही़ यामुळे शेतकऱ्यांना नाचणगाव शाखेतून प्रमाणपत्र न मिळाल्यास रित्या हाताने परत जावे लागत असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)पुलगावात एटीएम बंदमुळे खातेदार त्रस्तनाचणगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत तर पुलगाव येथील एसबीआयचे रेल्वे स्थानकावर लागलेले एटीएम गत अनेक दिवसांपासून बंद आहे़ यामुळे शहरातील एसबीआयच्या ग्राहकांना एकाच एटीएमवर विसंबून राहावे लागते़ बँक आॅफ इंडियाचीही शहरात दोन एटीएम आहेत़ यातील एक एटीएम महिन्यातून १५ दिवस बंद असते़ यामुळे ग्राहकांना शहरातील सर्व एटीएम तपासावे लागत असल्याचे दिसते़रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले एटीएम शहरातील नागरिकांसह प्रवाश्यांकरिता अत्यंत महत्त्वाचे असते; पण गत आठ ते दहा दिवसांपासून सदर एटीएम बंद आहे़ तेथील शटरवर तांत्रिक बिघाडामुळे एटीएम बंद असल्याचे नोंदविण्यात आले आहे़ दहा दिवसांपासून एटीएम मशीनचा बिघाडच दुरूस्त झाला नसल्याचेच यावरून दिसते़ याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तरी जलद कारवाई होत नसल्याने शहरातील खातेदारही त्रस्त झाले आहेत़ असाच प्रकार बॅक आॅफ इंडियाच्या एटीएमचा असून तेही सदोदित बंदच राहत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत़