शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के सिंचनाखाली असलेले लिंगापूर

By admin | Updated: February 8, 2016 02:13 IST

निसर्गाने परिपूर्ण सौंदर्य खुलविलेले लिंगापूर हे २८५ लोकवस्तीचे गाव. गावाच्या सभोवताल हिरवळीमुळे नंदनवनाचाच भास होतो.

चार फुटांवरच विहिरींना लागले पाणी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटलाअमोल सोटे आष्टी (शहीद)निसर्गाने परिपूर्ण सौंदर्य खुलविलेले लिंगापूर हे २८५ लोकवस्तीचे गाव. गावाच्या सभोवताल हिरवळीमुळे नंदनवनाचाच भास होतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या नाऱ्याचे पालन करणाऱ्या या गावाच्या मदतीला अप्पर वर्धा धरणही आले आहे. यामुळे येथील संपूर्ण जमीन सिंचनाखाली आली. सिंचनाची सवय असल्याने या गावातील नागरिक बारमाही पीक घेत असल्याचे सांगतात. गावात पाणी अडविण्यावर भर देण्यात आल्याने येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. आदिवासी बहुल असलेल्या लिंगापूर गावात रोजमजुरी करणारे नागरिक अधिक आहेत. येथील शेतीत गहू, चना, सोयाबीन यासह भाजीपालाही पिकविल्या जातो. येथे संत्र्याच्या बागाही आहेत. गावात असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे प्रदुषणाची समस्या गावात जाणवत नाही. सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब कंगाले याच गावचे. राजकारणातही गाव मागे नाही. जिल्हा परिषद लहान आर्वी सर्कलचे सदस्य नंदकिशोर कंगाले याच गावचे. भाजपाचे तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर हे सुध्दा येथीलच. त्यामुळे गावात नेहमी वर्दळ पाहावयास मिळते. प्रत्येक शेतकऱ्याकडे हक्काची विहीर असावी म्हणून शासकीय योजनांमधून अनुदानावर सिंचन विहिरीचे बांधकाम केले आहे. हरिदास राऊत, गवळी यांच्या शेतात तर अवघ्या चार फुटावर पाणी लागले आहे. पहिल्या टप्प्यातील गव्हाचे पीक पूर्ण झाले असून पुन्हा गव्हाची पेरणी सुरू आहे. लिंगापूर-अंतोरा असा कमी वेळेत अंतर गाठणारा नवा रस्ताही मंजूर झाला आहे. गावासभोवताल असलेल्या जंगलाला वाचविण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने गावकऱ्यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले जाते. शंभर टक्के सिंचनामुळे गाव तालुक्यासाठी आदर्श ठरणारे आहे. गावातील संपूर्ण रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. गावाच्या रस्त्यालगत दोन्ही बाजुने सामाजिक वनीकरण विभागाने मनरेगामधून वृक्षलागवड केल्याने हिरवीगार झाडे पाहायला मिळत आहे. गावात अनेक घरे पक्की आहेत. टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील वाद तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडविल्या जाते. याकडे शासनाने आदर्श गाव म्हणून लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.